• Sun. Jun 7th, 2026
    Maharashtra Heat Stroke: सावधान! राज्यात दीड महिन्यात उष्माघाताचे 17 रुग्ण; पारा आणखी वाढण्याची शक्यता

    Maharashtra Heat Stroke: महाराष्ट्रात एक मार्च ते १५ एप्रिलदरम्यान उष्माघाताच्या १७ रुग्णांची नोंद झाली आहे. कोणत्या जिल्ह्यात धोका अधिक? कशी घ्यावी काळजी?

    दीड महिन्यात उष्माघाताचे १७ रुग्ण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने आता उष्माघाताचे रुग्ण आढळत आहेत. राज्यात एक मार्च ते १५ एप्रिलदरम्यान उष्माघाताच्या १७ रुग्णांची नोंद झाली. रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यांत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत उष्माघातामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

    रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक चार रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यात तीन रुग्ण आढळले असून, जालना आणि पालघर येथे प्रत्येकी दोन रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात आढळलेल्या तीन रुग्णांपैकी दोन रुग्ण बुधवारी आढळले. गडचिरोली, गोंदिया, जळगाव, नंदुरबार, नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांत प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.

    Maharashtra TimesPune Heatwave : पुण्यात यंदा विक्रमी तापमान! उष्णतेची लाट तुलनेने दुर्मिळ आणि गंभीर
    एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा वाढत असून, अनेक ठिकाणी तो ४० अंशांपुढे गेला आहे. दुपारी उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. विशेषतः उन्हात दीर्घ काळ काम करणारे मजूर, बांधकाम क्षेत्रातील कामगार, शेतकरी; तसेच रस्त्यावर काम करणाऱ्या व्यक्तींना उष्माघाताचा धोका अधिक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

    सर्व जिल्ह्यांमध्ये औषधे आणि आवश्यक उपायोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागातर्फे देण्यात आल्या आहेत. उष्णतेच्या काळात उष्माघात प्रतिबंध व उपचाराकरिता जिल्हा आणि महापालिका स्तरावर ‘कोल्ड रूम’ सुरू करण्याच्या सूचना दिल्याचे आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. संदीप सांगळे यांनी सांगितले.
    Maharashtra TimesPune Crime : ’50 लाख दिल्याशिवाय सुटका नाही’; कॅफेत गप्पा, प्लॅन्ट दाखवायला नेलं अन् पुढे थेट किडनॅप; देणी वसूल करण्यासाठी मेट्रो कंत्राटदारासोबत खळबळजनक प्रकार
    या लक्षणांकडे द्या लक्ष
    स्नायूंमध्ये वेदना होणे, अशक्तपणा जाणवणे, तीव्र डोकेदुखी, सतत उलट्या, श्वास घेण्यास त्रास होणे, लघवी कमी होणे, जास्त घाम येणे यांसारख्या लक्षणांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    काय करावे?
    -पुरेसे पाणी प्यावे, संतुलित आहार घ्यावा.
    -कैरी पन्हे, कोकम, लिंबू सरबत, डाळिंब रस, नारळ पाणी प्यावे.
    -पांढरे किंवा फिकट रंगाचे, सुती व सैल कपडे वापरावे.
    -उन्हात बाहेर फिरणे टाळावे, उन्हातून आल्यावर लगेच थंड पाणी पिणे टाळावे.
    -थंड वातावरणातून उन्हात जाऊ नये.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा