छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्यात कमालीचा दुरावा असल्याचं बघायला मिळालं.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सध्या महत्त्वाच्या घडामोडी घडत आहे. पक्षसंघटना मजबूत व्हावी यासाठी पक्षाच्या वरिष्ठांकडून प्रयत्न केले जात आहे. यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना चांगली संधी दिली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पुढचे तीन वर्षे मोठ्या निवडणुका नसल्याने आता पक्षाने पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. याआधी पुण्यात पक्षात संघटनात्मक पातळीवर मोठ्या घडामोडी सुरु असल्याचे वृत्त समोर येत होतं. त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्येही पक्ष संघटना मजबूत करावी यासाठी महत्त्वाच्या हालचाली सुरु आहेत. याच निमित्ताने एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे हे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी महत्त्वाची आढावा बैठक घेतली. पण या बैठकीत पक्षाचे दोन नेते आपापसात नाराज असल्याचं चित्र बघायला मिळालं. त्यामुळे याबाबतच्या चर्चांना उधाण आलं.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आढावा बैठकीमध्ये शिवसेनेमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याचे चित्र बघायला मिळाले. शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार आणि सध्याचे विद्यमान मंत्री संजय शिरसाट यांच्यात अबोला कायम असल्याचं आजच्या बैठकीत बघायला मिळालं. पालकमंत्री संजय शिरसाट व्यासपीठावर आल्यानंतर बाकी आमदारांनी त्यांच्यासोबत हस्तांदोलन केलं. मात्र अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट यांनी हस्तांदोलन करणं टाळलं. विशेष म्हणजे पालकमंत्री संजय शिरसाट आल्यानंतर आमदार अब्दुल सत्तार हे खुर्चीवरून उठलेही नाही आणि हस्तांदोलन देखील टाळले. दोघांच्या अबोल्यामुळे शिवसेनेतली अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली.
पालकमंत्री संजय शिरसाय यांनी व्यासपीठावर आल्यानंतर आमदार अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्यासोबत बोलणे पसंत केले. तर पालकमंत्री संजय शिरसाट हे इतरांशी बोलत राहिले. दोघांनी एकमेकांकडे बघणे आणि बोलणेही टाळले. त्यांच्या अबोल्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे. दरम्यान आढावा बैठकीनंतर श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बैठकीबाबत माहिती दिली.
श्रीकांत शिंदे काय म्हणाले?
“या मेळाव्यात पुढे शिवसेना कशी वाढेल, यासाठी बैठक आयोजित केली आहे. पुढील तीन वर्षांत कुठल्याही निवडणुका नाहीत. त्यानुसार बैठका घेतल्या जातील. वॉर्डनिहाय नियोजित बैठका सुरू राहतील. मतदार निसटणार नाहीत, याची दक्षता घेतली पाहिजे. कार्यकर्त्यांना भेटून, त्यांचं ऐकून घेण्यासाठी ही बैठक आहे. निवडणुकीनंतर आढावा म्हणा किंवा चिंतन बैठक म्हणा, आढावा घेतलाच पाहिजे. विधानसभा निवडणुकीत मोठ्या संख्येने निवडून आलो आहोत”, अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली.
“प्रत्येक पक्ष आपली ताकद कशी वाढेल, यासाठी प्रयत्न करत असतो. आम्हालादेखील आमच्या पक्षाची ताकद वाढवायची आहे. त्यासाठी आम्ही बैठका घेत आहोत. विधानसभा निवडणुकीपूर्वीही अशाच बैठका झाल्या होत्या आणि पुढेही घेणार आहोत. कोणताही पक्ष जिंकण्यासाठी काम करत असतो आणि आपल्या पद्धतीने काम करत असतो”, अशी प्रतिक्रिया देखील श्रीकांत शिंदे यांनी दिली.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा