Virar-Dahanu Local: पश्चिम रेल्वेच्या विरार रेल्वे स्थानकावर फलाटांच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. विरार-डहाणू चौपदरीकरणातील हा एक महत्त्वाचा टप्पा असून महिनाअखेर या मार्गावर 15 डब्यांची लोकल धावणार आहे.
म.टा. प्रतिनिधी, मुंबई: डहाणूपर्यंत १५ डब्यांच्या लोकलच्या प्रतीक्षेत असलेल्या पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना आता दिलासा मिळणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) विरार-डहाणू चौपदरीकरणातील विरार स्थानकातील फलाटाचे काम पूर्ण केले आहे. यामुळे आता विरार-डहाणूदरम्यान १५ डबा लोकल चालवण्याचा मार्ग खुला झाला आहे. महिनाअखेर ही गाडी धावल्यावर डहाणूतील लोकल प्रवाशांची गर्दीतून काही अंशी सुटका होण्याची आशा आहे.
विरार स्थानकातील फलाटांचे रुंदीकरण आणि विस्तारीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले. विरार स्थानकावरील ही कामे मार्गाच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी महत्त्वाची पायरी ठरणार आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसह उपनगरी वाहतुकीत कमीत कमी अडथळा येईल, याची काळजी घेत ही कामे पूर्ण करण्यात आली’, असे ‘एमआरव्हीसी’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास वाडेकर यांनी सांगितले. तर, ‘साध्या लोकलमधील गर्दी विभागण्यासाठी १५ डब्यांच्या फेऱ्या वाढवण्यावर भर आहे. १९ मार्चला १५ डबा लोकलच्या १६ फेऱ्यांमध्ये वाढ झाली. आता डहाणूपर्यंत १५ डबा सेवा सुरू होत असल्याने पश्चिम उपनगरी मार्गावरील क्षमता आणखी मजबूत होणार आहे’, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनित अभिषेक यांनी सांगितले.
Mumbai News: जुनं ते सोनंच! मेट्रोपेक्षा ‘बेस्ट’ला प्राधान्य; मेट्रो आरामदायी असूनही घाटकोपर-अंधेरी मार्गावर बस प्रवासालाच पसंती
तांत्रिक बिघाडामुळे टिटवाळ्यात लोकल खोळंबा
मध्य रेल्वेवरील टिटवाळा-आंबिवली दरम्यान रेल्वेच्या सिग्नल पॉइंटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल अर्धा तास खोळंबल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. कर्मचाऱ्यांनी तातडीने बिघाड दुरुस्त केल्यानंतर, अर्ध्या तासाने लोकल मार्गस्थ झाल्या. या काळात आंबिवली ते टिटवाळा दरम्यान चार लोकल गाड्या खोळंबल्या.
Mumbai Local Accident : लोकलच्या दारात उभं राहणं निष्काळजी नाही; कल्याण-डोंबिवली दरम्यान पडून मृत्यू, प्रवाशाच्या कुटुंबाला 14 वर्षांनी भरपाई
सोमवारी दुपारी ४ वाजता सिग्नल पॉइंटमध्ये बिघाड झाल्याने रेल्वे सेवा टिटवाळा ते आंबिवली या दरम्यान रखडली. बराच वेळ लोकल गाड्या थांबल्याने प्रवाशांनी ट्रॅकमध्ये उतरून चालत जाण्याचा पर्याय निवडला. जवळपास अर्ध्या तासाने लोकल मार्गस्थ झाल्यानंतर, प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. ‘तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा रखडली होती. मात्र २० मिनिटांत बिघाड दुरुस्त करत सेवा सुरळीत करण्यात आली,’ अशी माहिती रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा