• Sun. Jun 14th, 2026

    Solapur Crime: यात्रेच्या दिवशी वडिलांनी पिकांना पाणी द्यायला सांगितलं, रागाच्या भरात शेतात गेला; नववीतल्या पैलवान पोरानं आयुष्य संपवलं

    Solapur Crime: यात्रेच्या दिवशी वडिलांनी पिकांना पाणी द्यायला सांगितलं, रागाच्या भरात शेतात गेला; नववीतल्या पैलवान पोरानं आयुष्य संपवलं

    Solapur Wrestler Ends Life: सोलापूरात कासेगाव येथे रविवारी यात्रेच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली आहे. 16 वर्षीय पैलवान पोरानं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    इरफान शेख, सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे कासेगाव येथे धक्कादायक घटना घडली आहे. गावातील यात्रेच्या दिवशी शेतात पाणी द्यायला सांगितल्यामुळे रागाच्या भरात अवघ्या 16 वर्षाच्या पैलवान मुलाने शेतातच गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    हरिदास अशोक मोरे असे आत्महत्या केलेल्या सोळा वर्षीय युवकाचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी 8 च्या सुमारास उघडकीस आली. हरिदास हा गावातील तालमीत कुस्तीचे धडे घेत होता, त्याला भविष्यात पैलवान व्हायचे होते. तो इयत्ता नववीमध्ये शिकत होता. रविवारी, गावात यात्रा असल्यामुळे हरिदासला यात्रेत जायचे होते, पण अचानक वडिलांनी शेतात जाऊन पिकांना पाणी देण्यास सांगितलं. त्यामुळे हरिदास वडिलांवर चिडला होता, शेतात पाणी देण्यास गेला. मात्र तिथे जाताच त्याने शेतातील पत्र्याच्या शेड मध्ये गळफास घेतला.

    Maharashtra TimesNanded Crime : मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडताच शिवसेना नेत्याला संपवलं; तीन वर्षांपूर्वीही झाला होता जीवघेणा हल्ला, नांदेडमध्ये खळबळ

    रागाच्या भरात घराबाहेर पडल्यामुळे संशय

    सध्या उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे उन्हामुळे पिकं बाद होण्याची शक्यता जास्त असते. त्याच कारणामुळे हरिदासच्या वडिलांनी शेतात पाणी घालून मग जत्रेला जा असे त्याला सांगितले. पण यात्रेचा दिवस असल्यामुळे त्याने शेतात जायला नकार दिला. पण नंतर वडिलांच्या सांगण्यावरून तो मित्राच्या गाडीवरून शेतात गेला. त्याचा राग पाहून कुटुंबियांना संशय आला. यामुळे पित्याने त्याच्या भावाला थोड्या वेळाने पाठवून दिलं. पण तोपर्यंत हरिदास शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने लटकलेला होता.

    जिल्हा पातळीवर कुस्त्या खेळत होता

    हरिदासने गळाफास घेतलेले पाहताच त्याचा भावाने दोरी कापून त्याला खाली उतरविले. भावाने लगेच पित्याला बोलावून घेत त्याला लगेच शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. त्याच्या पश्चात आई वडिल, एक लहान आणि एक मोठा भाऊ असा परिवार आहे.

    Maharashtra TimesSolapur News: शाळा सुटली, मित्रांसोबत समर्थ नदीवर पोहायला गेला; पाचवीतील चिमुकल्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत

    हरिदासला कुस्त्यांची खूप आवड होती. गावाच्या तालमीत तो कुस्त्यांचे धडे घेत होता. जिल्हा पातळीवर अनेक कुस्त्यांत 62 किलो वजनीगटात त्याने पदक मिळवले होते. राज्य पातळीवर त्याची निवड देखील झाली होती. भावी पैलवानाने किरकोळ कारणावरून टोकाचे पाऊल उचलले. शासकीय रुग्णालयात नातेवाईकांचा मोठा आक्रोश पाहायला मिळाला.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा