• Sun. Jun 14th, 2026
    पिके मातीमोल! राज्यात अवकाळीने 2 लाख हेक्टरवरील पिकांना फटका; 29 जिल्ह्यांत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

    Maharashtra Unseasonal Rain Loss: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांचेही प्रचंड हाल झाले आहेत.

    अवकाळीचा फटका(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आतापर्यंत एकूण २९ जिल्ह्यांना फटका बसला असून राज्यभरात जवळपास दोन लाख चार हजार ८३५ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. नाशिक, धुळे, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.

    या अवकाळी पावसामुळे १४ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत हे नुकसान झाले आहे. यात केळी, गहू, मका, हरभरा, आंबा, ज्वारी, टरबूज, भाजीपाला, कलिंगड, डाळिंब, कांदा, संत्रे आणि द्राक्षांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

    Maharashtra TimesAnjali Damania: रुपाली चाकणकरांचे खरातला 177 कॉल्स; अंजली दमानियांचा दावा, बड्या मंत्र्यांची घेतली नावं!
    महाजन यांच्याकडून पाहणी
    सिन्नर : नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी सिन्नर तालुक्यातील बाधित भागांची प्रत्यक्ष पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. मंत्री महाजन यांनी चिंचोली तसेच वडगाव पिंगळा या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचा आढावा घेतला. चिंचोली येथे शेतकरी रमेश नागरे यांच्या कांदा पिकाची तसेच आनंदीबाई काशिनाथ कांगणे यांच्या बीट व कांदा पिकाची त्यांनी पाहणी केली.

    शिंदे गटाची डिनर डिप्लोमसी, ठाकरेंचे खासदार गळाला? संजय राऊतांचं परखड मत

    जिल्हावार नुकसान (१४ मार्च ते ३१ मार्च)
    नाशिक : ३०,४४८ हेक्टर
    अहिल्यानगर : २३,६३३ हेक्टर
    जळगाव : २२,३६१ हेक्टर
    धुळे : १४,८३२ हेक्टर
    बुलढाणा : ८,५०७ हेक्टर
    छत्रपती संभाजी नगर : ८,४४५ हेक्टर
    सोलापूर : २,४३९ हेक्टर
    पुणे : १,७८५ हेक्टर
    जालना : १,६९२ हेक्टर
    धाराशीव : १,४०७ हेक्टर
    अकोला : ९३१ हेक्टर
    अमरावती : ६९६ हेक्टर
    नांदेड : ५०२ हेक्टर
    २९ जिल्ह्यांमध्ये एकूण नुकसान: १,२२,९९७ हेक्टर

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा