• Tue. Jun 16th, 2026
    Mumbai Crime : मुंबईत बांगलादेशी किन्नर बाबू खान टोळीचा पर्दाफाश, अल्पवयीन मुलांसोबत नको-नको ते केल्याचा आरोप

    मुंबईत बांगलादेशी किन्नर बाबू खान टोळीचा पर्दाफाश झाला आहे. बाबू खानची टोळी अल्पवयीन मुलांचं अपहरण करायची. यानंतर पीडित मुलांना किन्नरांसारखी वेशभूषा करुन देहव्यापार किंवा भीक मागायला भाग पाडायची, असा आरोप केला जात आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मुंबईत बांगलादेशी किन्नर बाबू खान याच्या टोळीचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे. विशेष म्हणजे या बाबू खानला सहा महिन्यांपूर्वी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. हा बाबू खान अल्पवयीन मुलांचं अपहरण करायचा. त्यानंतर अल्पवयीन मुलांना किन्नरांसारखी वेशभूषा करायला लावायचा. त्यानंतर त्यांच्यामार्फत चुकीच्या मार्गाने पैसे कमवायचे असे काम बाबू खान करत होता. तो अल्पवयीन मुलांचं अपहरण करुन त्यांना किन्नर सारखा वेशभूषा परिधान करायला मजबूर करायचा. त्यानंतर त्यांना देहव्यापार आणि भीक मागायला लावून कोट्यवधी रुपयांची कमाई करायचा.

    विशेष म्हणजे मुंबईपोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी त्याला अटक केली होती. पण त्यानंतर त्याला काही दिवसांनी जामीन मिळाला. पण जेलमध्ये जावून आल्यानंतरही बाबू खान हा वठणीवर आला नाही. त्याने आपले कूकृत्य सुरुच ठेवले. तो अशाचप्रकारे अल्पवयीन मुलांचे अपहरण करायचा आणि त्यांना मारझोड आणि जीवे मारण्याची धमकी देवून देहव्यापार आणि भीक मागायला भाग पाडायचा असा आरोप करण्यात येत आहे.

    बाबू खान याच्या टोळीच्या आरोपींनी गोवंडी येथील एका अल्पवयीन मुलाचं अपहरण केलं होतं. त्याला किन्नरांसारखी भीक मागायला लावली. तसेच अनैसर्गिक कृत्य करुन पैसे कमवायला भाग पाडलं. संबंधित पीडित मुलाच्या कुटुंबियांनी या मुलाचा शोध घेतला. या प्रकरणात बाबू खान टोळीने त्याचं अपहरण केल्याचं उघड झालं. पीडित मुलाच्या कुटुंबियांनी तातडीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला. मुलगा आता पालकांकडे सुखरुप परतला आहे. पण आरोपी बाबू खान हा फरार आहे. त्याचा सहकारी सफरे उर्भ झारा याला सध्या पोलिसांनी अटककेली आहे.

    पीडित मुलाच्या आईने सांगितला थरार

    पीडित मुलाच्या आईने एका वृत्त वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत संबंधित घटनेचा थरार सांगितला. “मुलगा एकदम बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. त्याला गुंगीचं औषध दिलं होतं की काय ते माहिती नाही. यावेळी आम्ही त्याला बघून रडलो. त्याची सुटका करुन घेण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. पण आरोपींच्या टोळीतील लोकं त्याला सोडत नव्हते. ते म्हणाले की, तुझ्या मुलाला आम्ही देणार नाहीत. आज देत आहोत, एक-दोन वेळा देऊ. पण तिसऱ्या वेळी देणार नाहीत. त्यानंतर आम्ही त्याला कसेतरी घेऊन आलो आणि त्याला त्याचदिवशी तातडीने गावी पाठवून दिलं”, असं पीडित मुलाची आई म्हणाली.

    “तो एक महिना आणि तीन दिवस गावात होतो. त्यानंतर आरोपी त्याला तिथून उचलून घेऊन आले. मी त्या लोकांकडे गेले. तिथे प्रचंड आरडले. पण त्यांनी माझं ऐकलं. दोन दिवसांनी तुझ्या मुलाला शोधून आणू असं त्यांनी मला सांगितलं. दोन दिवसांनी झाराने मला फोन केला की, ये आणि तुझा मुलगा आला आहे. त्याला भेटून घे. रमजानचा वेळ होता. आम्ही रात्री बारा वाजता गेलो तेव्हा पाहिलं की, त्याला मुलीचे कपडे परिधान केले होते. त्याचे कान टोचले होते. त्याला आमच्या विरोधात भडकावलं होतं. तो म्हणायचा की, मला तुमच्याकडे यायचं नाही. मी या लोकांकडे राहणार नाही”, असं पीडित मुलाच्या आईने सांगितलं.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा