“आजची युद्धे स्वार्थापोटी, जग विनाशाच्या उंबरठ्यावर”; नागपुरात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली जागतिक संघर्षावर चिंता.
‘सर्वांना जोडून ठेवण्याची ताकद..’
ते पुढे म्हणाले की, जगात सर्वांना एकत्र जोडणारा कोणताही प्रभावी तत्व आज अस्तित्वात नाही. मात्र, भारताकडे हे सामर्थ्य आहे. “सर्वांना जोडून ठेवण्याची ताकद भारतात आहे. आपल्या ऋषी-मुनींनी दिलेल्या ज्ञानामुळेच हे शक्य आहे,” असे त्यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की, जगभरातून भारताकडे आशेने पाहिले जात आहे आणि काही ठिकाणी असा विश्वासही व्यक्त केला जात आहे की सध्याचे युद्ध भारतच थांबवू शकतो असेही भागवत म्हणाले.
‘शक्तीशिवाय कोणीही ऐकत नाही’
भागवत पुढे म्हणाले की, “शक्तीशिवाय कोणीही ऐकत नाही”, “आपण मानवतेच्या कायद्याने चालतो, मात्र जगातील अनेक भाग अजूनही जंगलाच्या कायद्याने वागत आहेत,” अशी टीका त्यांनी केली. त्यांनी धर्म, संस्कार आणि अनुशासन यांची गरज अधोरेखित करत समाजाने एकत्रितपणे पुढे जाण्याचे आवाहन केले. धर्माच्या अज्ञानामुळेच माणूस लोभ आणि स्वार्थाच्या मार्गावर जातो, असे सांगत त्यांनी मंदिरांना संस्कार केंद्र म्हणून महत्त्व दिले.
Pune Crime : पुण्यातील सोसायटीत गेटवर राडा, प्रवेश नाकारल्याने वॉचमनवरच काठीने हल्ला
“पूर्वी मंदिर हे केवळ पूजा करण्याचे ठिकाण नव्हते, तर ते समाजाला दिशा देणारे केंद्र होते,” नव्या भारताच्या संविधानातही या मूल्यांचे प्रतिबिंब दिसून येते. समाजाला एकत्र आणणे, त्याला बळकट करणे आणि संपूर्ण जगाला योग्य दिशा देणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून विश्व हिंदू परिषदेसारख्या संस्थांची स्थापना करण्यात आली आहे.
‘काही लोक कायद्याच्या आडून इतरांवर…’
मोहन भागवत यांनी अमेरिकेवरही अप्रत्यक्ष टीका केली. “काही लोक कायद्याच्या आडून इतरांवर आघात करतात,” समाजाला जोडण्यासाठी आणि भारताला जागतिक नेतृत्वाच्या दिशेने नेण्यासाठी सर्वांनी संकल्प करावा. “जे काही आहे ते सर्वांचे आहे, ही भावना रुजवणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.
