लोकसंख्या नियंत्रण आणि तीन अपत्यांच्या भूमिकेवर नरेंद्राचार्य महाराज यांनी भाष्य केलं आहे. मोहन भागवत यांनी मांडलेली ‘तीन अपत्य’ भूमिका योग्य असल्याचे म्हणत त्यांनी लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या मुद्द्यावरही त्यांचं मत मांडलं आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे एक कार्यक्रमानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. लव्ह जिहाद, लोकसंख्या नियंत्रण आणि धर्मांतराच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. लव्ह जिहादवर भाष्य करताना ते म्हणाले की, “हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात.
मुलींशी लग्न करून त्यांना विकण्याचे प्रकार घडत आहेत. हे थांबवण्यासाठी कडक कायदा हवा. जर एखाद्या हिंदू मुलीने परधर्मीय मुलाशी लग्न केले, तर त्या मुलीचा आणि होणाऱ्या मुलांचा धर्म बदलू नये, अशी तरतूद कायद्यात असायला हवी.”
Beed Crime : परळीत माणुसकीला काळीमा; 16 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार, महाराष्ट्रात संतापाची लाट, नराधमांचा शोध सुरु
अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर टीका
अंनिसच्या (अंधश्रद्धा निर्मूलन समिती) कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी आरोप केला. “ख्रिश्चन मिशनरींकडून होणाऱ्या धर्मांतरावेळी अंनिस कुठे असते? ही समिती मिशनरींना विकली गेली आहे का? त्यांच्याच पैशावर ही समिती चालते का?” असा सवाल त्यांनी विचारला. आपण कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून केवळ चुकीच्या प्रवृत्तीच्या विरोधात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
LPG Gas shortage : ‘वि’चित्रा’ ताई, 25 दिवस आम्ही तुमच्या घरी जेवायला यायचं का?’ रोहिणी खडसेंचा चित्रा वाघ यांच्यावर घणाघात
‘हिंदू व्होट बँकच आहे का?’
सरकारवर टीका करताना महाराज म्हणाले की, “शाळा-महाविद्यालयात ख्रिश्चन आणि मुस्लिमांचा इतिहास शिकवला जातो, त्यामुळे धर्मांतर वाढत आहे. तिथे हिंदूंचा इतिहास का शिकवला जात नाही? मदरशांना आणि ख्रिश्चन शाळांना अनुदान दिले जाते, मग वेद विद्वान शाळांना अनुदान का मिळत नाही? हिंदूंना फक्त ‘व्होट बँक’ म्हणून वापरू नका,” असंही मत त्यांनी यावेळी मांडलं.
