जित पवार यांचा अपघात नसून घातपात आहे का याचा तपास, चौकशी व्हावी यासाठी रोहित पवारांनी जंगजंग पछाडलं. आधी मुंबईतील मरिन लाइन्स पोलिस स्थानकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसह DGCA विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी रोहित पवार पोहोचले. DGCA कडून VSR कंपनीवर कारवाई करण्यात आली त्याबद्दल पत्रक जारी करण्यात आलं होतं.त्या आधारावर रोहित पवार यांनी मरीन लाइन्स पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी FIR दाखल करून घेण्यास नकार दिल्यानं रोहित पवार आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईत तक्रार दाखल होत नाही म्हटल्यावर रोहित पवारांनी हक्काची बारामती गाठली. पण जे मुंबईत घडलं त्याचीच प्रचिती रोहित पवार यांना बारामतीतही आली. अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी FIR दाखल होत नाही हे दुर्दैवी असल्याचं सांगत रोहित पवार आता यावर संसदेत आवाज उठवला जावा यासाठी दिल्लीत जाऊन नेत्यांच्याही भेटी घेत आहेत.. याच दरम्यान आता अजित पवार अपघात प्रकरणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केलाय. हा तक्रार अर्ज कुठे दाखल केलाय, त्यात नेमकं काय म्हटलंय आणि अर्जदारांची नेमकी मागणी काय आहे तेच या व्हिडिओत पाहू..