अर्थसंकल्पामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजनेची घोषणा केली असं शिरसाट म्हणाले.शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी देऊन फडणवीसांनी विरोधकांच्या भ्रमाचा भोपळा फोडला असं शिरसाट म्हणाले.उद्धव ठाकरे विधान परिषदेत गेले पाहिजे मात्र तिथे गेल्यानंतर बसले पाहिजे असं शिरसाट म्हणाले.मुख्यमंत्री असताना मंत्रालयामध्ये दोन वेळा बसणारे मुख्यमंत्री विधान परिषदेत किती वेळ बसतील असा प्रश्न शिरसाटांनी केला.उद्धव ठाकरे विधान परिषदेत आल्याने दुःख झालं नाही पण त्यांनी जनतेच्या प्रश्नावर बोलावं असं शिरसाट म्हणाले.