इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल १०० रुपयांनी महागणार असल्याच्या अफवेमुळे पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पाहा, नेमकं सत्य काय आहे आणि प्रशासनाने काय आवाहन केलंय…
सोशल मीडियावरील अफवेचा परिणाम
युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशातील इंधनपुरवठ्यावर परिणाम होईल, तसेच पेट्रोलचे दर मोठ्या प्रमाणात वाढतील, अशी चर्चा सोशल मीडियावर वेगाने पसरली. “पेट्रोल १०० रुपयांनी महागणार” अशा अफवांनी नागरिकांमध्ये घबराहट निर्माण झाली. परिणामी, अनेक वाहनचालकांनी खबरदारीचा उपाय म्हणून वाहनांमध्ये जास्तीत जास्त इंधन भरून घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे विहूर येथील पेट्रोलपंपावर एकाच वेळी मोठी गर्दी उसळली.
वाहनांच्या रांगांमुळे वाहतुकीवर परिणाम
सकाळपासूनच अनेक वाहनचालक पेट्रोलपंपावर दाखल झाले होते. काही वेळातच वाहनांच्या रांगा मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठी गर्दी झाल्यामुळे स्थानिक वाहतुकीवरही काही प्रमाणात परिणाम झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.
Pune News: महिला दिनानिमित्त PMPML कडून पुणेकरांना खास भेट; केवळ 500 रुपयांत घडणार ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचे दर्शन
प्रशासनाचे स्पष्टीकरण आणि आवाहन
दरम्यान, या संदर्भात अधिक माहिती घेतली असता प्रत्यक्षात कोणतीही इंधनटंचाई नसल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित पेट्रोलपंपावर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून इंधनपुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पेट्रोलचे दर १०० रुपयांनी वाढणार असल्याची चर्चा निव्वळ अफवा असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. इंधनाचा पुरवठा नियमित सुरू असून कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही. त्यामुळे घाबरून इंधन साठवण्याची किंवा अनावश्यक गर्दी करण्याची गरज नसल्याचे सांगण्यात आले.
Nagpur Crime: कॉलेजमधले प्रेमसंबंध, सोनालीच्या लग्नानंतरही भेटायचा; नवऱ्यानं ट्रॅप लावला, होळीला गावी आलेल्या सागरची पती-पत्नीनं मिळून हत्या केली
परिस्थिती आता पूर्ववत
युद्धाच्या बातम्या आणि सोशल मीडियावर पसरत असलेल्या अपुष्ट माहितीमुळे अनेकदा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. त्याचाच परिणाम म्हणून पेट्रोलपंपावर ही गर्दी वाढल्याचे दिसून आले. मात्र, काही तासांतच वस्तूस्थिती समोर आल्यानंतर परिस्थिती पूर्ववत झाली. इंधनपुरवठा सुरळीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वाहनचालकांमधील भीतीही दूर झाली आहे.
