इराण-इस्रायल युद्धामुळे मध्यपूर्वेतील हवाई मार्ग बंद झाले असून जालन्याचे खासदार डॉ. कल्याणराव काळे दुबईत अडकले आहेत. त्यांच्यासोबत जालन्याचे ५ पर्यटकही तेथेच थांबले असून मायदेशी परतण्यासाठी उड्डाणांच्या प्रतीक्षेत आहेत.
पाच पर्यटकही अडकले
जालना शहरातील इतर पाच पर्यटकही दुबई आणि अबुधाबी येथे अडकल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. संबंधित प्रवाशांशी भारत सरकारकडून वेळोवेळी संपर्क साधला जात असून ते सध्या सुरक्षित स्थळी असल्याची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील इतर प्रवाशांनाही अशाच अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे समोर आले आहे.
हवाई मार्गांवर निर्बंध
मध्यपूर्वेतील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी आपले हवाई मार्ग तात्पुरते बंद किंवा मर्यादित केले आहेत. परिणामी, विमान कंपन्यांनी उड्डाणांचे पुनर्नियोजन सुरू केले असून काही कंपन्यांनी तिकिटांचे रद्द किंवा बदल शुल्क शिथिल करण्याची घोषणा केली आहे. प्रवाशांनी अधिकृत संकेतस्थळांवरून अद्ययावत माहिती तपासावी, असे आवाहन विमान कंपन्यांकडून करण्यात आले आहे.
Lunar Eclipse 2026: होळीच्या रंगातच वर्षातील पहिलं खग्रास चंद्रग्रहण, खगोलप्रेमींसाठी खास पर्वणी, श्रद्धा-शास्त्राचा संगम अनुभवण्याची संधी
कार्यकर्त्यांमध्ये चिंता
दरम्यान, जालना शहरासह संपूर्ण लोकसभा मतदारसंघात खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. युद्धजन्य परिस्थिती असलेल्या ठिकाणी ते अडकले असल्यामुळे सरकारने तातडीने योग्य ती उपाययोजना करून त्यांना लवकरात लवकर मायदेशी आणावे, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्ते तसेच नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Thane News: मध्यपूर्वेतील परिस्थिती गंभीर, ठाणे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर; परदेशातील नागरिकांसाठी विशेष मदत कक्ष सुरू
दरम्यान, इराण आणि इस्रायल यांच्यातील तणावाबद्दल सांगायच झाल्यास आता हे युद्ध तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने चालले आहे का, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत. त्याचा परिणाम भारतावर काय होणार याचाही विचार चर्चेमध्ये येतो आहे.
