• Wed. Sep 16th, 2026

‘बोले सो निहाल, सत श्री अकाल’च्या जयघोषात भाविकांनी घेतले पावन दर्शन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Mar 1, 2026
‘बोले सो निहाल, सत श्री अकाल’च्या जयघोषात भाविकांनी घेतले पावन दर्शन – महासंवाद

नवी मुंबई, दि. ०१ :  ‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खारघर येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य धार्मिक कार्यक्रमात दुसऱ्या दिवशीही लाखो भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. “वाहे गुरु” व “बोले सो निहाल, सत श्री अकाल” च्या जयघोषात श्री गुरु ग्रंथ साहिबजी यांचे पावन दर्शन घेतले जात आहे.

संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला होता. अखंड कीर्तन, गुरुवाणी आणि प्रार्थनेमुळे वातावरण अधिकच आध्यात्मिक झाले होते.

लंगर व सोयी-सुविधांची उत्तम व्यवस्था

भाविकांच्या सोयीसाठी आयोजकांकडून चोख नियोजन करण्यात आले आहे. प्रशासन, स्वयंसेवक आणि विविध सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने कार्यक्रम सुरळीत सुरू आहे. देशातील विविध राज्यातून आलेल्या सर्व धर्माचे भाविक शांतता, शिस्त व श्रद्धेने दर्शनाचा लाभ घेत आहेत.

भाविकांसाठी लंगरची व्यवस्था करण्यात आली असून लाखो भाविक त्याचा लाभ घेत आहेत. तसेच चहा, अल्पोपहार, ज्यूससह विविध माहितीपर स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.

त्याग आणि मानवतेचा संदेश

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या अद्वितीय त्याग, धर्मनिष्ठा आणि मानवतेच्या संदेशाचे स्मरण या शहीदी समागमातून करण्यात येत आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून समाजात बंधुता, एकता आणि सर्वधर्मसमभावाचा प्रभावी संदेश दिला जात आहे.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed