Jalgaon-Chhatrapati Sambhajinagar Highway: जळगाव ते संभाजीनगर महमार्ग आता सहा पदरी होणार असून तो खान्देश एक्सप्रेसवे म्हणून ओळखला जाणार आहे. हा मार्ग लवकरच थेट समृद्धी महमार्गाशी जोडला जाणार आहे.
विधानपरिषदेच्या कामकाजादरम्यान आमदार एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नांवरून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यात या महामार्गाबाबत आश्वासन दिले होते, याची आठवण करून देत खडसे म्हणाले, ‘घोषणा होऊन बराच काळ लोटला, पण प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार? हा मार्ग केवळ कागदावरच राहणार का?’ असा थेट सवाल उपस्थित केला.
Mumbai-Ahmedabad Bullet Train: राज्यात बुलेट ट्रेनची 4 स्थानकं, पहिल्या टप्प्यात ठाणे, विरारचा विकास; कधी-कसं होणार काम?
केळी उत्पादकांना होणार फायदा
या महामार्गामुळे जळगावच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यावर जळगावची केळी थेट समृद्धी महामार्गावरून मुंबई आणि नागपूरच्या मोठ्या बाजारपेठांमध्ये अत्यंत कमी वेळेत पोहोचू शकेल. या महामार्गामुळे जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील व्यापार आणि उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे.
विकासाची नवी आशा
या महामार्गामुळे जळगाव ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर केवळ वेळेच्या दृष्टीनेच कमी होणार नाही, तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा यांच्यातील दळणवळणाचे एक नवे पर्व सुरू होईल. खडसे यांच्या पाठपुराव्यामुळे सरकारने दिलेल्या या उत्तराने जळगाव जिल्ह्यात समाधान व्यक्त होत असून, आता सर्वांचे लक्ष या मार्गाच्या भूमीपूजनाकडे लागले आहे.
Nashik-Akkalkot Highway: नाशिक-अक्कलकोट महामार्गाला गती! 30 गावांमधून जाणार रस्ता; कसा असेल 374 किमी लांब मार्ग?
काय आहे ‘खान्देश एक्स्प्रेस’ प्रकल्प?
सरकारच्या वतीने उत्तर देताना राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी या प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. हा मार्ग थेट समृद्धी महामार्गाला जोडला जाईल. ज्यामुळे मुंबई आणि नागपूरकडे जाणारी वाहतूक वेगवान होईल. प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, त्यानंतर तांत्रिक मान्यतेसह प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे त्यांनी सांगहतले.
