मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आहेत. ते नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर कार्यक्रमस्थळी जात असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.