महाराष्ट्राचं विधीमंडळांचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज (२३ फेब्रुवारी) सुरु झालं.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर हे पहिलंच अधिवेशन पार पडत आहे.रोहित पवारांनी विधानभवानातील अजित पवारांच्या आठवणी जागवल्या.अधिवेशनाला येताना मनामध्ये दुःख आहे असंही रोहित पवारांनी सांगितलं.काहीही झालं तरी लढायचं हे अजित दादांनी सांगितलं होतं असंही रोहित पवार म्हणाले.