महाराष्ट्र शासनाच्या वतीनं माझी वसुंधरा अभियान सन्मान सोहळा मुंबईत पार पडला.या सन्मान सोहळ्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी हजेरी लावली.माझी वसुंधरा अभियान नसून एक लोक चळवळ बनली आहे असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.निसर्गाच्या बाबतीत अजित दादांच्या मनातलं हळवेपण अनेकांनी अनुभवलं असं सुनेत्रा पवारांनी सांगितलं.महाराष्ट्रात होणारा विकास हा फक्त आर्थिक वाढीसाठीच नाही तर……तो शाश्वत, पर्यावरणपूरक आणि भावीपिढ्यांचा विचार करणारा असावा हे दादांचं स्वप्न होतं असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.