Diva Junction Bridge: दिवा रेल्वे फाटकामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात अडथळा येत आहे. १३ वर्षांपासून रखडलेला दिवा रेल्वे उड्डाणपूल अद्याप अपूर्ण आहे. रेल्वे मंडळाने यावर तातडीने लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत.
2012-13 मध्ये पुलाला मंजुरी
दिवा रेल्वे स्थानकातील रेल्वे फाटक बंद करून त्याजागी पूल उभारण्याच्या प्रस्तावाला सन २०१२-१३ मध्ये मंजुरी देण्यात आली. उड्डाणपुलाचे रेल्वे रुळांवरील भागाचे काम पूर्ण झाले असून त्याला जोडणाऱ्या मार्गांचे काम अपूर्ण आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण अशा अतिशय वर्दळीच्या मार्गावर दिवा रेल्वे फाटक आहे. १ जुलै २०२५ रोजी राज्य सरकारने पत्रातून राज्यात सुरू असलेल्या ३९ रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) आणि दहा रुळांखालील ये-जा करण्याचा मार्ग (आरयूबी) प्रकल्पांबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे नमूद केले आहे.
Dighi Port to Pune: रायगड-पुणे प्रवासात वेळ वाचणार? ताम्हिणी घाटासाठी दोन पर्यायी मार्ग प्रस्तावित; 30 ते 50 किमी अंतर होणार कमी
दिवा स्थानकाजवळील गेट क्रमांक २९ हा सर्वाधिक गर्दीचा आणि संवेदनशील बिंदू असल्याने त्याकडे विशेष लक्ष वेधावे, असे पत्र तत्कालीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश यादव यांनी तत्कालीन मुख्य सचिव, राज्य सरकार, राजेश मीना यांना पाठवले आहे. दिवा रेल्वे जंक्शनमधून धीम्या आणि जलद अप-डाउन लोकल, अप-डाउन मेल-एक्स्प्रेस आणि मालगाड्या त्याचबरोबर दिवा मेमू गाड्यांची वाहतूक केली जाते. अनेकदा रेल्वे फाटक खुले झाल्यानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. ही वाहन कोंडी फुटेपर्यंत रेल्वेगाड्या खोळंबतात. रोज साधारण ३० ते ४० वेळा रेल्वे फाटकाची उघड-बंद होते.
Mumbai Melody Road: दिवस-रात्र वाजणाऱ्या गाण्याने रहिवासी वैतागले, ‘मेलडी रोड’चा प्रयोग बनलाय त्रासदायक; थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत…
पत्रात काय?
रुळांवरील भागाचे काम मार्च 2024मध्ये पूर्ण झाले आहे. मात्र, त्याला जोडणाऱ्या मार्गाचे काम ठाणे महापालिकेकडून करण्यात येत आहे. भूसंपादनाच्या प्रश्नामुळे हे जोडमार्ग रखडले आहेत. या मार्गावर सतत वाहतूक सुरू असते. अशा स्थितीत रेल्वे फाटक बंद करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वे उड्डाणपूल लवकर सुरू होणे आवश्यक आहे. राज्य आणि महापालिकेच्या स्तरावर रेल्वे पूलाच्या जोडरस्त्यांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपदनासाठी तातडीने सूचना देऊन हा प्रश्न निकाली काढावा.
