काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पत्रकार परिषद घेतली.चंद्रपूर महापालिकेत झालेल्या राजकारणावर चेन्नीथला यांनी भाष्य केलं.ठाकरेंच्या शिवसेनेनं आम्हाला मत देणं अपेक्षित होतं असं चेन्नीथला म्हणाले.चंद्रपूर काँग्रेसमधील वाद आम्ही मिटवले होते असंही चेन्नीथला यांनी सांगितलं.ठाकरेंची शिवसेना भाजपला मत देईल असं वाटलं नव्हतं असंही चेन्नीथला म्हणाले.चंद्रपूरमधील बदला आम्ही परभणीत घेतला नाही हे देखील चेन्नीथलांनी अधोरेखित केलं.