Mumbai Central Railway Station: मुंबई लोकलच्या महत्त्वाच्या तीन रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या स्थानकांचा विकास होणार आहे. यावेळी स्थानकांना जोडणारे पादचारी पूल, सरकते जिने आणि आधुनिक सुविधा सुरु करणार आहेत.
कोणत्या स्थानकांचा कायापालट?
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, ग्रांट रोड आणि चरणी रोड या रेल्वे स्थानकांवर सुधारणा करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेचे व्यवस्थापक प्रदीप कुमार यांनी याबद्दल माहिती दिली आहे. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात यांनी सोमवारी चर्चगेट येथील मुख्यालयात यांची भेट घेऊन रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना होणार्या समस्यांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी स्थानकांवरील पादचारी पूल, फेरीवाल्यांमुळे प्रवाशांची होणारी गैरसोय, प्रवेशमार्गांची सुधारणा अशा समस्यांवर चर्चा केली.
Mumbai Water Metro: डिसेंबरपासून मुंबईत धावणार ‘जल मेट्रो’, मंत्री नितेश राणेंचा गेमचेंजर प्लॅन; नरिमन पॉइंट, वर्सोवा… कसे असतील 8 मार्ग?
कसं-काय बदलणार?
मुंबई सेंट्रल स्थानकावर पश्चिम रेल्वेसह अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्याही सुटतात. त्यामुळे प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. प्रवाशांसाठी नवे सरकते जिने, लिफ्ट व सुरतक्षित व सुलभ प्रवासासठी अनेक आधुनिक सुविदा सुरु करण्याची मागणी केली. शिवाय गिरगावला चरणी रोड स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पूलाचं काम अपूर्ण आहे. ते काम लवकरात-लवकर पूर्ण करण्याची मागणीही यावेळी केली. त्यासोबत, ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे स्थानकांमध्ये प्रवेश करण्यास मदत व्हावी म्हणून सरकते जिने (Escalators) सुरु करण्याचा सल्ला ही त्यांनी या बैठकीत दिला.
Konkan Railways: शिमग्याला कोकणात जाताय? होळीसाठी मध्य रेल्वेकडून 186 विशेष गाड्या; मुंबई-सावंतवाडी ट्रेन कधी-कुठे?
तसेच, मुंबईतील अनेक रेल्वे स्थानक आणि परिसरातील ठिकाणांवर अधिकृत फेरीवाले आणि अतिक्रमांमुळे वाहतूक कोंडी होते. त्यांच्यावर कारवाई करून हे परिसर नागरिकांसाठी मोकळे करण्याचीही त्यांनी यावेळी मागणी केली. विजय कुमार यांनी या सर्व समस्यांची दखल घेऊन यासंदर्भा अहवाल सादर करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर या नवीन प्रकल्प सुरु करून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे. या नव्या सुविधांमुळे मुंबईकरांचा प्रवास सुलभ होणार आहे. रेल्वे स्थानकावर सामान घेऊन जाणाऱ्या प्रवाशांना या जिने आणि पुलांचा फायदा होणार आहे.
