• Fri. Mar 6th, 2026
    Pune PMPL Bus: महाशिवरात्रीनिमित्त पीएमपीकडून जादा बसेसची सोय, कोणत्या मार्गे धावणार? असे आहे नियोजन

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) महाशिवरात्रीनिमित्त येत्या रविवारी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन शहर व उपनगरांतील महत्त्वाच्या बसस्थानकांवरून जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. या दिवशी निळकंठेश्वर, बनेश्वर व घोरावडेश्वर या प्रमुख शिवमंदिरांना जाण्यासाठी जादा बस सोडण्यात येणार आहेत.

    दर वर्षी महाशिवरात्रीला या मंदिरांत हजारो भाविकांची उपस्थिती असते. यंदादेखील भाविकांना सुरक्षित, सुलभ व वेळेवर प्रवास करता यावा यासाठी महामंडळाने अतिरिक्त बस उपलब्ध करून दिल्या आहेत. स्वारगेट ते निळकंठेश्वर मंदिर येथे जाण्यासाठी स्वारगेट मुख्य स्थानकावरून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

    Pune News: पुण्यात PMPML च्या चालत्या इलेक्ट्रिक बसला भीषण आग, 50 कामगार थोडक्यात बचावले, क्षणात बसचा सांगाडा…, आगीचं नेमकं कारण काय?
    पहिली फेरी पहाटे साडेतीन वाजता असून, नियमित मार्ग असलेल्या स्वारगेट-पानशेत/वरसगाव या मार्गावर १४ बस सोडण्यात आल्या आहेत; तसेच कात्रज सर्पोद्यान ते बनेश्वर मंदिर येथे जाण्यासाठी कात्रज सर्पोद्यान येथून बससेवा आहे. पहिली फेरी पहाटे साडेपाच वाजता असून, दर २० मिनिटांनी बस सोडण्यात येणार आहे. याशिवाय कात्रज-सारोळामार्गे कापूरहोळ, कात्रज-सासवडमार्गे , बालाजी मंदिर केतकावळे, कात्रज-राजगड, कात्रज-वांगणीवाडी या बसदेखील या मार्गावरून जाणार आहेत.

    भाजपकडून कारवाई, अमोल बालवडकर संतापले; थेट केंद्रीय मंत्र्यांच्या निलंबनाचा इशारा

    घोरावडेश्वर येथे निगडीवरून बस
    निगडी (पवळे चौक) ते घोरावडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) घोरावडेश्वर मंदिर येथे जाण्यासाठी निगडी येथून बससेवा उपलब्ध आहे. या ठिकाणावरून पहाटे पाच वाजून २० मिनिटांनी पहिली बस सुटेल. याशिवाय मार्ग क्रमांक २२८, ३०५, ३३२, ३४१, ३४२, ३६८, ३७१ या क्रमांकांच्या बस या मार्गावरून जातात. याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

    Maharashtra TimesVirendra Sinha Pune : आय लव्ह यू रिया, कुठल्या तरी जन्मात पुन्हा भेटू; शेवटचा मेसेज केला, पुण्यातील IT कर्मचाऱ्याने लोणावळ्यात आयुष्य संपवलं
    पीएमपीच्या ताफ्यात ४५ ई-बस
    पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात पाच वर्षापूर्वी येणाऱ्या ई-बसपैकी ४५ बस अखेर दाखल झाल्या आहेत. अद्यापही ११० बस दाखल होणे बाकी आहे. एकीकडे पीएमपीला बसची आवश्यकता असताना ठेकेदाराकडून या बस दाखल करण्यास उशीर केला जात आहे; पण पीएमपी प्रशासन त्यांच्यावर मेहरबान का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed