दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत जनता दरबार पार पडला.उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शनिवारी (१४ फेब्रु.) सकाळी बारामतीत दाखल झाल्या. सुनेत्रा पवार सहयोग निवासस्थानी येताच नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. अजित पवारांनी दिव्यांग बांधवांना दिलेल्या शब्दाची पूर्तता करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. या पहिल्याच जनता दरबारात दिव्यांग बांधवांच्या घरकुलासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.