राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा पार पडत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा गदारोळ पाहायला मिळाला. परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी महिलांना चक्क त्यांचं ‘सौभाग्याचं लेणं’ म्हणजेच मंगळसूत्र काढून ठेवण्यास भाग पाडण्यात आलं.या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर बोचरी टीका केली आहे.हे सरकार केवळ नावापुरतं हिंदुत्ववादी आहे का? असा सवाल अंबादास दानवेंनी केला.