New Traffic Rule: गेल्या वर्षभरात पुणे आरटीओने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १८ हजार जणांवर कारवाई केली आहे, तर पुणे वाहतूक पोलिसांनी केलेली कारवाई लाखांमध्ये आहे.
देशभरात रस्ते अपघातामध्ये मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. अनेक वाहनचालक नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे निष्पाप नागरिकांचा मृत्यू होते. त्यामुळे आता केंद्र सरकारने ‘ केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९ ’मध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार एका वर्षात पाच वेळा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी नव्या वर्षापासून सुरू झाली आहे.
Lonavala Crime: सोलो ट्रेकला गेलेल्या तरुणीचा लोणावळ्यात मृत्यू; 400 फूट खोल दरीत आढळली बॉडी, तिच्यासोबत काय घडलं?
लायसन्स रद्द कारवाईत सिग्नल तोडणे, हेल्मेट न घालणे, सीटबेल्ट न लावणे यांसारख्या नियमभंगाचाही समावेश करण्यात आला आहे. एका वर्षात एकाच वाहनावर पाचवेळा कारवाई झाल्यास वाहनाची नोंदणी काही काळासाठी रद्द होईल. त्यानंतर त्या वाहनाला फिटनेस प्रमाणपत्र, बँक कर्ज, परमिट, एनओसी मिळणार नाही; तसेच वाहनाचे नूतनीकरण किंवा हस्तांतरणही करता देखील अडचण येणार आहे.
Mumbai Pune Expressway : वाहनावरील नियंत्रण सुटलं, आडोशी बोगद्याच्या तोंडाशी टँकर पलटी, मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर वाहतूक ठप्प; पर्यायी मार्ग कोणता?
दंड न भरल्यास वाहन ‘ब्लॅकलिस्ट’
वाहतूक नियम मोडल्यास संबंधित वाहनधारकास तीन दिवसांत ऑनलाइन माध्यमातून ई-चलन पाठवले जाणार आहे. या चलनवर आक्षेप घेण्यासाठी किंवा दंड भरण्यासाठी ४५ दिवसांची मुदत दिली जाईल. ही मुदत संपल्यानंतर दंड न भरल्यास वाहन ‘ब्लॅकलिस्ट’ करण्यात येणार असून, लायसन्स व नोंदणीशी संबंधित सर्व कामे थांबवली जातील. ई-चालानवरील आक्षेप वाहतूक अधिकाऱ्यांनी फेटाळल्यास संबंधित वाहनधारकास न्यायालयात दाद मागता येईल. मात्र, त्यासाठी दंडाच्या ५० टक्के रकमेचा भरणा अगोदर करणे अनिवार्य आहे. दंड न भरल्यास वाहनाची विक्री, नूतनीकरण, हस्तांतरण; तसेच फिटनेस प्रक्रिया होणार नसल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.
