Mira Bhayandar Mayor Election : परस्पर बंडखोरी करत नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यास भाजपची डोकेदुखी वाढू शकते.
मिरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. यात भाजपने बहुमताचा ४८चा आकडा ओलांडला असून सर्वाधिक ७८ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे निश्चितच भाजपचा महापौर होणार आहे. आरक्षण सोडतीत महापौरपद हे सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित झाले आहे. त्यासाठी येत्या ३ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर, आज, शुक्रवारी उमेदवारांना नामांकन अर्ज दाखल करता येणार आहे.
महापौरपदासाठी अनेक महिला नगरसेवक इच्छुक आहेत. यासह महापौरपद महिलांसाठी राखीव झाल्याने उपमहापौरपदासाठीच्या दावेदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यावेळी आपल्याला उमेदवारी न मिळाल्याने नाराज होऊन बंडखोरी करत काही नगरसेवकांकडून दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Ajit Pawar : अजितदादांसोबत विमान अपघातात निधन; सहसा मेसेज न करणाऱ्या शांभवीने आजीला केलेला अनपेक्षित WhatsApp, पहाटे 6.34 वाजता म्हणालेली…
तसे झाल्यास नंतर बंडखोर उमेदवाराला नामांकन अर्ज मागे घेण्याकरिता समजूत काढण्यासाठी मोठी कसरत भाजप ला करावी लागू शकते. त्यात यश न आल्यास निवडणुकीत मतविभागणी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यासह भाजप नगरसेवकांमध्ये महापौर-उपमहापौर निवडीवरून नाराजी असल्याचा संदेश संपूर्ण शहरात जाऊ शकतो.
Ajit Pawar PCMC model : बारामतीनंतर दादांनी पिंपरी चिंचवडला कसं बनवलं विकासाचं मॉडेल ?
या भीतीपोटी मागील दोन दिवसांपासून भाजपच्या नगरसेवकांना वरिष्ठांकडून फोन जात असल्याचे विश्ववसनीय सूत्रांकडून कळते. यावेळी कोणीही नगरसेवक महापौर-उपमहापौर अर्जावर अनुमोदक आणि सूचक म्हणून स्वाक्षरी घेण्यासाठी आल्यास ती पूर्वपरवानगीशिवाय न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यंदा बहुतांश नगरसेवक पहिल्यांदा निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना महापौर-उपमहापौर निवडणुकीची माहिती नसल्याने जुन्यांसह प्रामुख्याने नव्या नगरसेवकांना हे निर्देश दिले जात आहेत.
Ajit Pawar : दादांच्या मृत्यूबाबत शरद पवारांपासून आधी लपवलेलं; तुम्ही असे का उभे आहात? ‘त्या’ गोष्टीमुळे शंका येताच काकांनी विचारलं अन्…
“भाजपचे निवडून आलेले बहुतांश नगरसेवक नवीन असल्याने त्यांना महापालिकेच्या कामकाजाची माहिती नाही. त्यामुळे नकळत कोणत्याही कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या त्यांच्याकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कागदपत्र वाचून आणि न कळल्यास जाणकारांकडून माहिती घेऊन कोणत्याही कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामागे महापौर-उपमहापौर निवडणुकीत बंडखोरी होण्याची भीती असणे, हे कारण नाही” असे मिरा-भाईंदर भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांनी सांगितले
