• Wed. Jun 17th, 2026
    Anjali Bharti : अंजली भारतीच्या अडचणी वाढणार? शिवसेना महिला सेनेचं राज्य महिला आयोगाला पत्र

    शिवसेनेच्या महिला सेनेने गायिका अंजली भारतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे. राज्य महिला आयोगाकडे या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करण्यात आली असून, भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी निर्देश देण्याची विनंती केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : “भंडारा जिल्ह्यातील शहापूर येथे १३ जानेवारीला आयोजित भीम मेळाव्यामध्ये गायिका अंजली भारती हिने भाषण करताना सध्या घडत असलेल्या बलात्काराच्या घटनांचा संदर्भ देत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह, निंदनीय आणि चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. सदर वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बलात्कारासारख्या अत्यंत गंभीर आणि संवेदनशील गुन्ह्याचा निषेध करताना दुसऱ्या स्त्रीवर बलात्कार करा अशा आशयाचे वक्तव्य करणे हे केवळ असंवेदनशीलच नाही, तर समाजात द्वेष, हिंसा आणि विकृत मानसिकतेला प्रोत्साहन देणारे आहे. असे वक्तव्य महिलांच्या सन्मान, सुरक्षितता व कायद्याच्या मूलभूत तत्त्वांच्या पूर्णतः विरोधात आहे”, असं शिवसेनेच्या महिला सेनेने म्हटलं आहे.

    शिवसेना महिला सेनेच्या प्रवक्त्या सुशीबेन शाह यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र पाठवत या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “अंजली भारती हिच्या इतर अनेक व्हिडीओंमध्ये ती पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधातही थेट व आक्षेपार्ह भाषा वापरताना दिसून येते. यावरून तिची वक्तव्ये सातत्याने भडकावू स्वरूपाची असून समाजात तेढ व अस्थिरता निर्माण करणारी असल्याचे स्पष्ट होते”, असं पत्रात म्हटलं आहे.
    Maharashtra TimesJitendra Awhad : ‘हाथी चले अपनी चाल कुत्ते भोंके हजार’, सहर शेखच्या आव्हानावर जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रिया
    “महिला आयोगाचा उ‌द्देश महिलांचा सन्मान, सुरक्षितता व हक्कांचे संरक्षण करणे हा आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे महिलांविरोधातील हिंसेला अप्रत्यक्ष समर्थन मिळण्याचा अत्यंत धोकादायक संदेश समाजात जात आहे. तरी सदर प्रकरणाची महिला आयोगाने तात्काळ गंभीर दखल घ्यावी”, अशी भूमिका पत्रात मांडली आहे.
    Maharashtra TimesChandrapur News : चंद्रपुरात मोठा ‘गेम’ चेंज? ठाकरे गट आणि काँग्रेसचा महापौर बसणार? वाचा Inside Story
    “गायिका अंजली भारती हिच्यावर तसेच संबंधित कार्यक्रमाच्या आयोजकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. भविष्यात अशा प्रकारची चिथावणीखोर, महिलांचा अपमान करणारी वक्तव्ये रोखण्यासाठी कठोर निर्देश देण्यात यावेत”, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. “महिलांच्या सन्मान व सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण या प्रकरणात कठोर व न्याय्य भूमिका घ्याल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे”, असंदेखील पत्रात म्हटलं आहे. यामुळे आता राज्य महिला आयोगाकडून आता काही कारवाई करण्यात येते का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा