• Mon. Mar 16th, 2026

    Solapur–Indore Flights: सोलापूर विमानतळ मुंबईनंतर आणखी एका महत्त्वाच्या शहराला जोडणार; आजपासून सेवा सुरू, वेळापत्रक जाणून घ्या

    Solapur–Indore Flights: सोलापूर विमानतळ मुंबईनंतर आणखी एका महत्त्वाच्या शहराला जोडणार; आजपासून सेवा सुरू, वेळापत्रक जाणून घ्या

    Solapur Airport: सोलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आजपासून, सोलापूर विमानतळावरून एका महत्त्वाच्या शहरासाठी विमानसेवा सुरू झाली आहे. वेळापत्रक, तिकिटांचे दर सर्व माहिती जाणून घ्या

    सोलापूर: सोलापूर-मुंबई विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच सोलापूरकरांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज, 19 जानेवारीपासून सोलापूर-इंदूर विमानसेवेची अधिकृत सुरुवात झाली आहे. स्टार एअर या विमान कंपनीकडून ही सेवा सुरू करण्यात आली असून, त्यामुळे सोलापूर आता देशातील आणखी एका महत्त्वाच्या शहराशी हवाई मार्गाने जोडला जाणार आहे.

    वेळापत्रक पाहा

    सोलापूर-मुंबई ही विद्यमान विमानसेवा आता इंदूरपर्यंत वाढवण्यात आली आहे. सोलापूरहून विमान दुपारी 2.50 वाजता उड्डाण करेल आणि 3.55 वाजता मुंबईला पोहोचेल. मुंबईत सुमारे 45 मिनिटांचा थांबा घेतल्यानंतर विमान सायंकाळी 4.35 वाजता इंदूरकडे रवाना होईल. हे विमान सायंकाळी 5.50 वाजता इंदूर विमानतळावर पोहोचेल, अशी माहिती देण्यात आली आहे.Maharashtra TimesMumbai News: दीड तासांचा प्रवास 15 मिनिटांवर, नव्या रो-रो जेट्टीमुळे गोराई बीचवर जाणं सोपं; जलप्रवास कसा-कुठून?

    ही विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस सुरू असणार आहे. सोमवार, बुधवार आणि गुरुवार या दिवशी सोलापूर – इंदूर विमानसेवा सुरू राहणार आहे. या सेवेसाठी तिकीटदर प्रति प्रवासी 4,100 रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. या नव्या विमानसेवेचा सोलापूर आणि परिसरातील व्यापारी, उद्योजक, कारखानदार, व्यावसायिक तसेच सर्वसामान्य प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, सोलापूर-मुंबई विमानसेवेला प्रवाशांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेता, स्टार एअरने ही सेवा इंदूरपर्यंत विस्तारण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

    Navi Mumbai International Airport opening : अखेर ठरलं, नवी मुंबई विमानतळाला दिबांचं नाव नाही?

    दिल्ली विमानतळ

    दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (DIAL) ने घोषणा केली आहे की, मोठ्या प्रमाणावरील पुनर्पृष्ठीकरण आणि आधुनिकीकरण कार्यक्रमाचा भाग म्हणून, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एक धावपट्टी १६ फेब्रुवारीपासून जवळपास पाच महिन्यांसाठी बंद राहील. तिसऱ्या धावपट्टीवर मोठ्या प्रमाणावर दुरुस्तीचे काम करण्यासाठी तात्पुरती बंद केली जाईल. या तात्पुरत्या बंद असूनही, डीआयएएलने सांगितले आहे की विमानतळ दररोज 1,594विमानांच्या नियोजित हवाई वाहतूक क्षमतेनुसार कामकाज सुरू ठेवेल. विमान कंपन्या आणि हवाई वाहतूक नियंत्रणाला याबद्दल आधीच माहिती देण्यात आली आहे, आणि प्रवाशांना अखंड सेवा मिळावी यासाठी कार्यप्रणाली योजना तयार करण्यात आल्या आहेत.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा