• Fri. Sep 4th, 2026

Devendra Fadnavis यांची विजयानंतर मनं जिंकणारी प्रतिक्रिया, कार्यकर्त्यांना म्हणाले, ‘सेलिब्रेशन करा, पण उन्माद नको’

Devendra Fadnavis यांची विजयानंतर मनं जिंकणारी प्रतिक्रिया, कार्यकर्त्यांना म्हणाले, ‘सेलिब्रेशन करा, पण उन्माद नको’

निवडणुकीत जय-परायज हा होत राहतो. पण या निकालाकडे खेळाडू वृत्तीने पाहणं अपेक्षित आहे. पण काही वेळेला निकालावरुन विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मोलाच्या सूचना दिल्या आहेत.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : महापालिका निवडणुकीत भाजपला मोठं यश आलं आहे. नागपुरात भाजपला पुन्हा सत्ता मिळाली आहे. तर मुंबईत सत्तापालट होताना दिसत आहे. ठाकरेंच्या सत्तेला सुरुंग लावण्यात भाजपला यश मिळालं आहे. भाजपला मुंबईत सर्वाधिक जागांवर यश मिळालं आहे. या विजयानंतर मंत्री नितेश राणे यांचा ठाकरेंना डिवचणारा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडीओवर पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी फडणवीसांनी आपण सर्व कार्यकर्त्यांना विजयाचा आनंद साजरा करण्यास सांगितलं आहे. पण उन्माद करु नये, असं आवाहन केल्याचं सांगितलं.

“मुंबईसह महाराष्ट्रात भाजपला आणि आमच्या महायुतीला जनतेने अभूतपूर्व असा कौल दिलेला आहे. जो विकासाचा अजेंडा आम्ही चालवत आहोत त्याला लोकांनी एकप्रकारे दिलेली पसंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दाखवलेला हा जनतेचा विश्वास आहे. एक अभूतपूर्व अशाप्रकारचे हे यश आहे, जे कदाचित यापूर्वी कोणत्याही पक्षाला मिळालं नसेल. असं यश आम्हाला मिळालं आहे. मी महाराष्ट्राच्या जनतेचे अतिशय मनापासून आभार मानतो”, अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

“मी नागपुरात आहे. हे माझे मतदारसंघ आहे. नागपुराच्या जनतेनेदेखील बहुमत दिलं आहे. त्यामुळे नागपूरकरांचे देखील आभार मानतो. या अभूतपूर्व विजयानंतर आम्ही कुठेही अतिआत्मविश्वासात जाणार नाहीत. कुठेही गर्वात जाणार नाहीत. ही जनतेनी ठाकलेली आमच्यावरील जबाबदारी आहे. ही जबाबदारी योग्यप्रकारे आम्हाला निभवायची आहे. पुढच्या काळातही आम्ही पारदर्शकपणे कारभार सांभाळण्याचा प्रयत्न करु”, असं फडणवीस यांनी सांगितलं.

“मुंबईच्या महापौराच्या चर्चेला पूर्णविराम आहे. कारण महायुतीला बहुमत मिळालं आहे. महायुतीचा मराठी आणि हिंदू महापौर बनेल. महाराष्ट्रात ब्रँड म्हणाल तो एकच होता तो म्हणजे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. इतर कुणीही स्वत:ला ब्रँड समजू नये. मी असं म्हणेन की, आमच्या विकासाच्या अजेंड्याला मुंबईकरांनी साथ दिली आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली नसती तर ही अवस्था कधीच झाली नसती”, असंदेखील देवेंद्र फडणवीस यांनी सुनावलं आहे.

“जिंकण्याचा आनंद आपण व्यक्त केला पाहिजे. पण कुठल्याही परिस्थितीत आपला आनंद हा कुणाला उन्माद वाटेल असा व्यक्त करु नये. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, ठाकरे आणि राणे यांचा इतिहास आहे. त्यामुळे काही गोष्टी ते व्यक्त होतात तर त्याला पार्श्वभूमी आहे. विजयाचा उन्माद कुणीच करु नये. मी माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. इतका सुंदर विजय मिळाला आहे. त्यामुळे आनंद जरुर व्यक्त करा, पण त्यांचा उन्माद करु नका”, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा