Nandurbar Crime News : नंदुरबारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहिता खचून गेली होती. खूप विचार केला पण शेवटी ज्याची भीती तेच घडलं? जाणून घ्या.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. मयत भाग्यश्री हिला तिचा पती गौरव चौधरी याचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. याच त्रासामुळे तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज तिच्या वडिलांनी, सुनील बन्सी चौधरी यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. या आरोपांमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Mumbai Crime: मुंबईत मद्य, मादक पदार्थांचा महापूर! निवडणूक काळात 45 कोटींचे अमली पदार्थ जप्त, 29 जणांवर गुन्हे दाखल
या घटनेनंतर मयत भाग्यश्रीचे आई-वडील आणि नातेवाईकांनी तातडीने शहादा पोलीस ठाणे गाठले. त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास हवालदार छोटुलाल शिरसाठ करत आहेत.
Mumbai Local: ट्रेनला लटकून प्रवास, अचानक हात सटकला अन् अनर्थ; धावत्या लोकलमध्ये क्षणात होत्याचं नव्हतं
शवविच्छेदन अहवालानंतर भाग्यश्रीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मयत विवाहितेच्या आई-वडिलांचा आणि नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेने एका तरुण विवाहितेचा अकाली मृत्यू झाला असून, यामागील सत्य काय आहे, हे पोलिसांच्या तपासातूनच समोर येईल. पोलिसांनी कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली असून, मोबाईल कॉल रेकॉर्ड, संदेश आणि घरातील परिस्थितीची पाहणी केली जात आहे. प्राथमिक तपास पूर्ण झाल्यानंतर आवश्यक ते कायदेशीर कलम लावण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
