कोल्हापुरात मिसळ कट्टा या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली.यावेळी देवेंद्र फडणवीसांनी रॅपिड फायर प्रश्नांची उत्तरं दिली.आवडता विरोधक राहुल गांधी असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.तर नरेंद्र मोदी हे राजकारणातले गुरु आहेत असं फडणवीस म्हणाले.मी राजकारणात नसतो तर वकील झालो असतो असं फडणवीसांनी सांगितलं.शिंदे साहेब सामाजिक क्षेत्रात तर अजित दादा उत्तम शेतकरी नाहीतर पोलीस इन्स्पेक्टर झाले असते असं फडणवीसांनी सांगितलं.