Man Shot Dead: अहिल्यानगरमध्ये रविवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. संडेसाठी सर्व मित्रांनी कंदुरी मटणाचा प्लॅन बनवला होता. परंतु त्यावेळी एकाने दुसऱ्या मित्राची गोळ्या झाडून हत्या केली, नेमकं काय घडलं?
नेमकं काय घडलं?
शाहिद राजमोहम्मद शेख (वय 22, रा. चांदा) असे मृत तरुणाचे नाव असून, रविवारी (दि. 11) सायंकाळी चांदा–शनिशिंगणापूर रोडवरील शेख वस्तीजवळ ही थरारक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बऱ्हाणपूर–चांदा शिवेलगत असलेल्या शेख वस्ती येथे शाहिद शेख यांच्या नातेवाइकाचा कंदुरीचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमासाठी शाहिदसह त्याची मित्रमंडळी उपस्थित होती. सायंकाळच्या सुमारास अत्यंत किरकोळ कारणावरून शाहिद आणि मित्रांमध्ये शाब्दिक वाद झाला. पाहता-पाहता वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि क्षणातच एकाने पिस्तुल काढून शाहिदवर गोळ्या झाडल्या. गोळ्यांचा मारा होताच शाहिद रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
Beed Crime : जेव्हा संधी मिळेल तेव्हा शरीर संबंध ठेवायचा, तिला कायम…. बीड पोलीस दलातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल
घटनेनंतर मारेकरी आणि त्याचे साथीदार अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे व शेवगाव उपविभागीय पोलिस उपअधीक्षक नीरज राजगुरू यांनी रात्री उशिरा घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत मारेकरी निसटले होते. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून परिसरात तणावाचे वातावरण आहे.
बसस्थानकातील व्यापाऱ्याचा थेट खून
मृत शाहिद शेख हा चांदा बसस्थानक परिसरात बकरी विक्रीचा व्यवसाय करत होता. सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाचा अशा प्रकारे भर कार्यक्रमात गोळीबार करून खून झाल्याने गावात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असला, तरी वापरलेले शस्त्र अद्याप सापडलेले नाही.
Ahilyanagar Crime: दुसरीशी संबंध ठेवले म्हणून तरुणीनं नातं संपवलं; तरूणानं मग लिव्ह-इन, लग्नाचं आमिष दाखवत गाडीत बसवलं अन्…
गावठी कट्ट्यांचा उघड उच्छाद
या घटनेनंतर चांदा गावात गावठी कट्ट्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वीही गावात अशाच प्रकारच्या वादांदरम्यान कट्ट्यांची चर्चा झाली होती. तरीही पोलिस प्रशासनाने ठोस कारवाई न केल्यानेच आज तरुणाचा जीव गेला, असा थेट आरोप ग्रामस्थ करत आहेत.चांद्यात गावठी कट्टे येतात कुठून? पोलिसांना ते दिसत नाहीत का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. गावठी शस्त्रांचा स्रोत शोधून कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
