• Mon. Mar 9th, 2026
    भ्रष्टाचारी तेतुका मेळवावा, चुनावी हिंदुत्व अन् रावणाचा पक्षप्रवेश; उद्धव ठाकरे भाजपवर तुटून पडले

    नाशिक: राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाल्यानंतर पहिली जाहीर सभा ही आज नाशकात पार पडली. यावेळी शिवसैनिक आणि मनसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. या सभेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला. भाजप हा आज उपटचुंबांचा पक्ष झाला आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जळजळीत टीका केली. तसेच, कुंभमेळ्यासाठी झाडे कापण्याच्या मुद्द्यावरूनही ठाकरेंनी भाजपला सुनावलं. इतकंच नही तर भाजप रावणालाही पक्षात घेईल, असं म्हणत ते अक्षरश: भाजपवर तुटून पडले.

    उद्धव ठाकरे काय म्हणाले?

    गेल्या दोन वर्षातील चौथी सभा, आजच्या सभेचा अधिक आनंद आहे. कारण माझ्या सोबत माझा भाऊ मनसे प्रमुख राज ठाकरे आहे. उद्याच्या महापालिकेतील भावी नगरसेवकांना सांगतो की जनता तुमच्याकडे अपेक्षेने पाहते, त्यांच्या व्यथा राज आणि संजय राऊत यांनी केलाच. राज ठाकरे यांनी सांगितलं की त्यांच्याकडे ही महापालिका असताना काय कामं केली, राजने नाशकात केलेली कामं आणि मुंबईत शिवसेनेने केलेली कामं. हे नागरिकांसाठी काम करणारे दोन्ही भाऊ एकत्र आले तर नाशिकचा काय उत्कर्ष होईल याचा तुम्ही विचार करा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पाणी टंचाई, कचरा, बेरोजगारी, गुंडगिरी वाढते आहे, सगळीकडे समस्या त्याच आहेत. राज्यात कुठल्याही शहरात गेलं तरी त्याच समस्या आहेत. हे गेल्या दहा वर्षात मोदींच्या काळात घडल्या.

    मला सगळे विचारत आहेत की एकत्र का आलात, जेव्हा एकत्र नव्हतो तेव्हा विचारायचे एकत्र कधी येणार, आता एकत्र आलो तर म्हणतात एकत्र का आलात? तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे का, तर आमच्या अस्तित्वाचा विचार तुम्ही करु नका, शिवसेनेला ६० वर्ष होणार, अनेक निवडणुकी लढवल्या, पराभव पचवला, विजय थोडा नशिबी आला तरी शिवसेना संपली नाही. मग आमचं अस्तित्व ठरवणारे तुम्ही कोण?

    दत्तक घेणारा बाप फिरकलाच नाही! राज ठाकरेंचा CM फडणवीसांवर थेट हल्ला; भलीमोठी यादीच वाचली

    तुमचं आणि तुमच्या भावी पिढीचं भवितव्य कसं असेल, हे ठरवणारी ही निवडणूक आहे – उद्धव ठाकरे

    ज्या शहरात निवडणुका आहेत, त्या शहरातील नागरिकांनी त्यांचं आणि त्यांच्या भावी पिढीचं आयुष्य कसं असणार आहे. हे ठरवणार ही निवडणूक आहे. आम्ही पोटतिडकीने का तुमच्यासाठी प्रयत्न करत आहोत. मला एक प्रश्न विचारायचं आहे, भाजपचं हिंदुत्व हे खरं हिंदुत्व आहे का चुनावी हिंदुत्व आहे. राम मंदिर बांधलं म्हणून तुम्ही डंका पिटला, आणि प्रभू रामचंद्र जिथे तपश्चर्येला बसले होते, ती सगळी झाडं कापली, उद्या कोणी विचारलं की राम कुठे राहिले होते, तर काय सांगणार हे नमो भवन आम्ही केलं आहे, संपूर्ण सत्यानाश करायचा, धर्माची पट्टी अशी लावायची की सगळे अंध भक्त झाले, तुमच्यावर मोहिनी टाकायची की स्वप्नात गुंतवून टाकायचं.

    देवेंद्र फडणवीस ज्यांनी हे शहर दत्तक घेतलं होतं, राज बरोबर बोलला ज्यांना राजकारणात पोरं होत नाही, त्यांना आमची पोरं दत्तक घ्यावी लागत आहेत. हे काय शहर दत्तक घेणार? म्हणून महोन भागवतांना टाहो फोडावा लागतोय की अपत्य वाढवा, अपत्य वाढवा म्हणजे तुमच्या राजकारणातले अपत्य वाढवा. त्यांचं तेवढं तरी ऐका. भाजप हा आज उपटचुंबांचा पक्ष झाला आहे. आमच्याकडे पोरांचा तोटा नाहीये. अस्सल निष्ठावान अजूनही इथेच आहेत. आम्ही मोठी केलेली माणसं गेली, पण ज्यांनी मोठी केली, ते इथेच आहेत.

    मला भाजप वाल्यांना विचारायचं आहे. काय आलंय तुमच्या, या उपटचुंबांच्या सतरंज्या उचलायच्या, आमच्यात असताना भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. तुम्हाला पक्ष वाढवायला कुत्ता चालतो, बिल्ली चालते, चुहा चालतो. अशी बरबटलेली माणसं पक्षात घ्यायची आणि त्यांची लंगोट साफ करुन त्यांना डोक्यावर घेऊन नाचायचं, हे निष्ठावंत भाजप वाल्यांच्या नशिबी आलं आहे, कसं तुम्ही राहाताय, हा भाजप तुम्हाला अपेक्षित होता? मला भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचं वाईट वाटतंय. देवयानी फरांदे यांना रडू आवरेना, मला त्यांच्याबद्दल आदर, ज्या पक्षाशी निष्ठा तुम्ही बाळगता तो पक्ष आज उपऱ्यांचा पक्ष झाला आहे. भाजप आज दलालांचा पक्ष झाला आहे. पक्षात चोर दरोडेखोर येत आहेत.

    ज्या रावणाला प्रभूरामाने मारलं त्या रावणालाही हे पक्षात घेतील इतके निर्लज्ज झाले आहेत हे, कुठे आहे यांचं हिंदुत्व. पाठीत वार केल्यानंतर मी कांग्रेससोबत गेलो, तेव्हा उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, मग भाजपने अकोटमध्ये एमआयएमसोबत युती केली. तेव्हा काय सुटलं नाही तुमचं, की काही नव्हतंच सुटायला. अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत युती केली.

    भ्रष्टाचारी तितुका मेळवावा, भाजपा पक्ष वाढवावा. तुमच्या व्यथांबद्दल कोण बोलतंय. मुंबईत आम्ही होर्डिंग्ज लावते, होय हे आम्ही केलं. मग मुंबईत जिजामाता उद्यानात पेंग्विन आणले, पण ते बघायला लोक तिकीट काढून गर्दी करत आहेत. त्यांच्या सभेला पैसे देऊन लोक आणावे लागत आहेत. तुमची किंमत पेंग्विन इतकीही नाही.

    महाराष्ट्र यांच्या दडपशाहीविरोधात शेपुट घालून आत बसणार, ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली, त्याची दुर्दशा करणाऱ्याच्या हातामध्ये तुम्ही पुन्हा आपलं नशीब त्यांच्या हाती देणार का? आमचा वचननामा बोगस मोदी गॅरंटी नाही, हा ठाकरेंचा शब्द आहे आणि ठाकरे जे बोलतात ते करतात. आम्ही त्यांच्या कामाचं श्रेय कधी घेतलं नाही, त्याची गरज नाही. मशाल तुमच्या हृदयात पेटली पाहिजे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed