• Sat. Mar 7th, 2026

    Mumbai Metro: तीन महिने उलटूनही भुयारी मेट्रोमध्ये ‘नो नेटवर्क’, खरं कारण आलं समोर; ‘या’ कंपनीच्या मनमानीमुळे प्रवाशांचे हाल

    Mumbai Metro: तीन महिने उलटूनही भुयारी मेट्रोमध्ये ‘नो नेटवर्क’, खरं कारण आलं समोर; ‘या’ कंपनीच्या मनमानीमुळे प्रवाशांचे हाल

    मुंबई: मुंबईमधील मेट्रो 3 ( Aqua Line ) सुरू होऊन आता तीन महिने झाले आहेत. मात्र, या भुयारी मार्गिकेवर अद्यापही अनेक प्रवाशांना ‘नो नेटवर्क’च्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. मेट्रोच्या उद्घाटनावेळी लवकरात लवकर संपूर्ण मार्गिकेवर मोबाईल नेटवर्क उपलब्ध होईल, असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, तीन महिने आणि नववर्ष सुरू होऊनही काही सिमकार्डना अद्याप नेटवर्क मिळालेलं नाही. नेमकं कारण काय, हे पाहूया.

    एमएमआरसीएलने मेट्रो सुरू करतानाच भुयारी मार्गिकेत नेटवर्क सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, वरळी ते कुलाबा दरम्यानच्या स्थानकांमध्ये नेटवर्क ब्लॅकआउटचा मोठा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. दूरसंचार सेवा प्रदाते आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) यांच्यात अद्यापही याबाबतचा गतिरोध कायम आहे.

    Versova-Bandra Sea Link: 100 वर्ष टिकणार मुंबईतील हा सागरी सेतू, 120 मिनिटांचा प्रवास फक्त 15 मिनिटांत; कुठे-कसा बांधणार?

    कोणाला मिळतो नेटवर्क?

    सध्या मेट्रो लाईनच्या काही भागांमध्ये फक्त Vodafone Idea (Vi) आणि BSNL ची कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. Jio आणि Airtel वापरकर्त्यांना मात्र संपूर्ण लाईनवर ‘नो नेटवर्क’चा सामना करावा लागत आहे. Vi चा दावा आहे की आरे ते आचार्य अत्रे चौक (वरळी) या स्थानकांपर्यंत नेटवर्क उपलब्ध आहे. मात्र, वरळी ते कफ परेड दरम्यान नेटवर्क समस्या असल्याच्या तक्रारी त्यांच्या ग्राहकांकडून येत आहेत. विशेष म्हणजे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (NMIA) देखील याच प्रकारची परिस्थिती पाहायला मिळत आहे.

    अडचण नेमकी कुठे?

    Aqua Line साठी MMRCL ने ACES इंडिया लिमिटेड या कंपनीसोबत भागीदारी केली आहे. मात्र, टेलिकॉम कंपन्यांचा आरोप आहे की ACES कडून नेटवर्क उभारणीसाठी अवाजवी दर आकारले जात आहेत. अनेक बैठका होऊनही तोडगा न निघाल्यामुळे अद्याप काही मेट्रो प्रवाशांना नेटवर्क सुविधा मिळू शकलेली नाही.

    एका प्रमुख टेलिकॉम ऑपरेटरच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ACES ने तब्बल 118 कोटी रुपयांचा भांडवली खर्च (Capex) असल्याचा दावा केला आहे. मात्र, टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्स (TSPs) च्या अंतर्गत अंदाजानुसार हा खर्च फक्त सुमारे 30 कोटी रुपयांपर्यंत असायला हवा.

    Maharashtra TimesBhusawal-Chittorgarh Highway: जळगावमध्ये बनतोय आणखी एक राष्ट्रीय महामार्ग; राजस्थान, मध्य प्रदेशमधून थेट… कसा असेल नवा मार्ग?

    सूत्रांनी सांगितलं की, “सुरुवातीला मुंबई मेट्रो आणि त्यांच्या विक्रेत्याकडून प्रति स्टेशन 13 लाख रुपये मागितले जात होते. नंतर हे शुल्क कमी करून प्रति स्टेशन 5.5 लाख रुपये करण्यात आलं. दुसरीकडे, TSP च्या अंतर्गत गणनेनुसार प्रति स्टेशन दरमहा प्रत्येकी 39,000 रुपये भांडवली खर्च आणि त्यावर 10 टक्के व्यवस्थापन शुल्क देणं अपेक्षित आहे.” याच आर्थिक वादामुळे भुयारी मेट्रोमधील नेटवर्क प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही आणि त्याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed