• Sat. Mar 7th, 2026
    कोरियन फूड कुठे मिळेल? चव्हाणांचा पायलट जेवण शोधत गेला, येताना भाजपच्याच सभेच्या गर्दीत अडकला, शेवटी…

    Ravindra Chavan Helicopter Pilot : कोरियन पद्धतीने जेवण मिळत असलेल्या हॉटेलमध्ये जेवायला पायलट गेला होता. तेथून परत येत असताना रवींद्र चव्हाण यांच्याच सभेसाठी झालेल्या गर्दीमुळे तो वाहतूक कोंडीत अडकला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अहिल्यानगर : कमी वेळेत जास्त सभा घेता याव्यात, यासाठी निवडणूक प्रचाराच्या काळात नेते मंडळी हेलिकॉप्टरचा वापर करतात. सभेच्या वेळांचीही नियोजन केले जाते. असे असूनही ऐनवेळी उदभवणाऱ्या गडबडीचा फटका बसतो. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना अहिल्यानगरमध्ये आज असाच अनुभव घ्यावा लागला. त्यांचा कोरियन पायलट कोरियन फूडच्या शोधात शहरातील हॉटेलमध्ये जेवायला गेला आणि चव्हाण यांच्याच सभेसाठी झालेल्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीत अडकला. त्यामुळे सभा संपवून वेळेत हेलिपॅडवर येऊन थांबलेल्या चव्हाण यांना उड्डाणासाठी अर्धा तास प्रतीक्षा करावी लागली.

    भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नगरला हेलिकॉप्टरने आले होते. सभेत अवघ्या दोन-अडीच मिनिटांचे भाषण करून चव्हाण हेलिपॅडवर परतले. चव्हाण यांनी लातूर व जालना येथे सभेला जायचे असल्याचे कारण देत अवघ्या एका मिनिटात भाषण उरकले. युतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करून ते निघून गेले. मात्र त्यांचा कोरियअन पायलट नगरमध्ये कोरियन पद्धतीने जेवण मिळत असलेल्या हॉटेलमध्ये गेला होता. तेथून परत येत असताना चव्हाण यांच्याच सभेसाठी झालेल्या गर्दीमुळे तो वाहतूक कोंडीत अडकला. त्यामुळे चव्हाण यांना तब्बल अर्धा तास उड्डाणासाठी प्रतीक्षा करावी लागली.
    Maharashtra TimesMaharashtra Politics : ‘बिनविरोध’ नगरसेवकांबाबत निवडणूक आयोगाचं मोठं स्पष्टीकरण, ‘नोटा’चा पर्याय देत मतदान घेण्याच्या मागणीवर उत्तर
    अहिल्यानगरमध्ये वेळेवर आलेल्या चव्हाणांना यांना सभेपूर्वीही कार्यकर्ते आणि नेते जमा होण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागली होती, त्यामुळे त्यांनी सभेत अवघे दोन अडीच मिनिटे भाषण करून पुढच्या सभेची वाट घरली. मात्र, हेलिपॅडरवर जाऊन अडकून पडावे लागले.

    युतीचा धर्म पाळण्याची जबाबदारी केवळ भाजपची नाही : चव्हाण

    सभेपूर्वी चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात सुरू असलेल्या आरोप-प्रात्यारोपवरही त्यांनी भाष्य केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता या वादासंबंधी चव्हाण यांनी पवार यांच्याकडेच बोट दाखवले. चव्हाण म्हणाले, सुरुवात ‘त्यांनी’ केली होती, म्हणून मला तसे बोलावे लागले, ते एक प्रकारचे प्रत्युत्तर होते. महायुतीचा धर्म पाळण्याची जबाबदारी एकट्या भाजपची नाही, असेही चव्हाण म्हणाले.
    Maharashtra TimesSuresh Kalmadi : पुण्याचा ‘सबसे बडा खिलाडी’ गेला, माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन
    उमेदवारी न मिळाल्याने राजांचा प्रश्न कसा सोडवणार याबद्दल चव्हाण म्हणाले, महायुतीमुळे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होतो, हे खरे आहे. पक्ष संघटनेत वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी मिळेल अशी अपेक्षा असते. परंतु युती-महायुतीमुळे सर्वांना बरोबरी घेऊन जाताना, पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. महामंडळावरील नियुक्त्या प्रलंबित ठेवण्यामागे हेही एक प्रमुख कारण आहे. अशा अन्याय झालेल्या कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर, राज्य पातळीवर, महामंडळावर संधी दिली जाईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.

    BMC Election 2026 | मुंबई महापालिकेवर कुणाचा महापौर बसणार? दादरकरांना काय वाटतं?

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा