• Fri. Mar 6th, 2026
    Marathi Sahitya Sammelan 2026: मराठीला अभिजात दर्जाचे लाभ द्या; साहित्य महामंडळाची मागणी, १७ ठरावांना मंजुरी

    99th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2026: मराठीला अभिजात दर्जाचे लाभ द्या, अशी मागणी साहित्य महामंडळाने केली आहे. याबाबत एकूण १७ ठराव साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी मांडण्यात आले.

    sahitya sammelan news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, सातारा: मराठीला अभिजात दर्जाचे लाभ देणारा कोणताही आदेश केंद्र सरकारने जारी केलेला नसून, त्यासाठी राज्य सरकारने केंद्रावर दबाव निर्माण करावा यासह एकूण १७ ठराव अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी मांडण्यात आले.

    साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार यांनी ठराव मांडले. अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठीला केंद्राकडून लाभ दिले जाणे आवश्यक आहे. मात्र, केंद्राने अद्याप याबाबत शासननिर्णयच काढलेला नाही. त्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत. राज्याच्या पातळीवरही प्रत्यक्ष कार्यासाठी अशासकीय तज्ज्ञांची समिती स्थापन करावी. राज्यातील १४ हजार मराठी शाळा समूहकरणाच्या नावाखाली बंद केल्या जाणार आहेत. त्यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होणार असून, आदिवासी, ग्रामीण भागातील मुलांच्या शाळांचे अंतर वाढणार आहे. हे थांबवून बंद पडलेल्या मराठी शाळा पुन्हा सुरू कराव्यात, अशा प्रमुख मागण्या या ठरावात करण्यात आल्या आहेत.

    Maharashtra TimesSatara Crime : पोलीस मागे लागताच गाडी साताऱ्याला वळवली, पण नाकाबंदीत अडकले; मनसे पदाधिकाऱ्याच्या खुनाचे आरोपी सिनेस्टाईल ताब्यात
    ठरावांमध्ये आणखी काय?
    -राज्यात ४० हजार शाळांमध्ये ग्रंथपाल नसून, निवृत्त झालेल्यांच्या पदांवर नवीन भरती करावी
    -गेल्या दहा वर्षांत तीन भाषा सल्लागार समित्यांनी सादर केलेले ५६ पानांचे मराठी भाषा धोरण सरकारने संक्षिप्त १२ पानी केले. ते मूळ धोरण तातडीने जाहीर करावे
    -मराठी भाषा विभागाने अपारंपरिक आंतरराष्ट्रीय मराठी विद्यापीठ स्थापन करावे
    -वादग्रस्त कर्नाटक सीमाभाग केंद्र शासनाने महाराष्ट्रात सामील करावा
    -दक्षिणेतील राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही मराठी भाषा विकास प्राधिकरण ही अर्धन्यायिक यंत्रणा स्थापन करावी
    -जागतिक कीर्तीचे लेखक, कलावंत अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा
    -नियोजित अनुवाद अकादमी ही सरकारी संस्था न करता साहित्य अकादमीसारखी स्वायत्त संस्था रूपात स्थापन करावी
    -राज्यात सर्व शाळांमधून मराठी भाषा विषय बारावीपर्यंत सक्तीचा करावा
    -ग्रंथालय चळवळीचे जनक श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराजांच्या कौळाणे (ता. मालेगाव, जि. नाशिक) या जन्मगावी आंतरराष्ट्रीय दर्जाचे -ग्रंथालय व स्मारक उभारण्यात यावे
    -कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेतर्फे कलबुर्गी येथे मराठी-कन्नड अनुवाद केंद्र स्थापन करण्यात यावे.

    Maharashtra Times…तर इंग्रजी शाळेच्या मुलांना गौतमी पाटीलच्या पदराचा फडकता वारा कसा कळतो? संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांचं वक्तव्य
    शंभरावे साहित्य संमेलन पुण्यात

    ‘सन १८७८ मध्ये पुण्यात पहिले ग्रंथकार संमेलन झाले. आता शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाद्वारे हे वर्तुळ पूर्ण होणार असून शंभरावे साहित्य संमेलन पुण्यात होईल,’ अशी घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी रविवारी केली

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा