मापगाव येथील सशस्त्र दरोडा प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासांत तब्बल 7 आरोपींना अटक केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, रायगड : अलिबाग तालुक्यातील मापगाव येथील कुचलुकु पोल्ट्री फार्मचे मालक कुणाल दिलीप पाथरे यांच्या घरावर झालेल्या धडाकेबाज सशस्त्र दरोड्याचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत पर्दाफाश केला आहे. सात आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत. ही कारवाई अलिबाग पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वी ठरली. या यशस्वी कारवाईमुळे रायगड पोलिसांच्या कार्यक्षमतेचा नागरिकांना पुन्हा एकदा प्रत्यय मिळाला आहे.
संबंधित दरोड्याची घटना ही शनिवारी (3 जानेवारी) मध्यरात्री घडली होती. कुणाल पाथरे यांच्या घरावर दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला केला. घरातील काही सदस्यांना डांबून ठेवण्यात आले, तर पेट्रोल अंगावर टाकून जीवे ठार करण्याची धमकीही दिली. दरोडेखोरांनी घरातील दागिने आणि रोकड असा एकूण 18 लाख 22 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. घटनेची गंभीरता ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत फर्णे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला.
पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या पथकाने सीसीटीव्ही कॅमेरे, स्थानिक माहिती आणि इतर साधनांचा वापर करून आरोपींचा शोध घेतला. अवघ्या काही तासांत सात आरोपी पकडण्यात आले आणि त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. प्राथमिक चौकशीत समोर आले की, आरोपी भिवंडी परिसराशी संबंधित आहेत.
सध्या पोलिसांकडून आरोपींची ओळख परेड घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. चोरीच्या ऐवजाच्या बाबतीत चौकशी केली जात आहे. त्यामुळे अद्याप आरोपींची नावे उघड करण्यात आलेली नाहीत. पोलीस प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे आणि अशा घटनांबाबत तत्काळ माहिती पोलीस ठाण्यात देण्यास सांगितले आहे.
अलिबाग पोलीस आणि गुन्हे अन्वेषण शाखेच्या जलद प्रतिसादामुळे दरोडेखोरांचा शोध घेणे शक्य झाले. स्थानिक पोलिसांच्या संघटीत आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे अवघ्या काही तासांत प्रकरण उघडकीस आले, ज्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत विश्वास वाढला आहे. स्थानिकांनीही या कारवाईचे स्वागत केले असून भविष्यात अशा गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
याशिवाय, पोलिसांनी घरच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना मजबूत करण्याचा सल्ला दिला आणि नागरिकांना सतत जागरूक राहण्याचे आवाहन केले. या घटनेतून स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा आणि गुन्हे अन्वेषणातील जलद प्रतिसादाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला आहे. मापगाव प्रकरणातून हेही स्पष्ट झाले की, पोलीस प्रशासनाने तत्परतेने कारवाई केली तर गुन्हे लवकर उघडकीस येऊ शकतात आणि नागरिकांचे सुरक्षिततेचे समाधान करता येते.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा