• Fri. Mar 13th, 2026
    Latur Election: निलंगेकरांची जादू चालली, तब्बल 120 बंडखोर बसले घरी; 28 जणांसाठीही खास रणणिती तयार, काँग्रेसचं टेन्शन वाढलं

    लातूरमध्ये महापालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. नेमकं काय घडतंय?

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ऋशिकेश होळीकर, लातूर: सध्या राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे वाहत आहे.लातूर महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेल्या भाजपच्या जवळपास १२० पेक्षा अधिक इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यावर बोलताना ‘लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा पक्षातील नाराज उमेदवारांनी बंडखोरी केली होती. यामध्ये तब्बल 120 उमेदवारांनी आत्तापर्यंत आपली उमेदवारी अर्ज वापस घेतले आहेत. मात्र 28 उमेदवारांनी अद्यापही उमेदवारी वापस घेतलेली नाही. निवडणूक लढण्यावर ते ठाम आहेत, मात्र तेही लवकरच भाजपामध्ये परततील’, असे संभाजी पाटील म्हणाले.

    जे कोणी निवडणुकीच्या रिंगणात राहिलेत तेही भाजपसोबत येतील, असे मोठे वक्तव्य भाजप नेते तथा माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी लातुरात केले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी डावलल्यामुळे भाजपमधील काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याच्या मुद्द्यावरून कालपासून राजकीय वातावरण तापले आहे. या विषयावर भाष्य करीत आ. निलंगेकरांनी हे वक्तव्य केले आहे.

    चिखल फेक करणे हा एकच मुद्दा काँग्रेसकडे आहे

    निवडणुकांमध्ये चिखलफेक करणे हा काँग्रेसचा एकमेव मुद्दा राहिला आहे. चिखलफेक करून सामाजिक वातावरण कसे खराब करता येईल, असा प्रयत्न आणि प्रचार काँग्रेसवाले करत असल्याचे म्हणत आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

    Maharashtra TimesNagpur Crime: डॉक्टरांकडे नेले, मारले तरी ऐकत नव्हता; शेवटचा पर्याय म्हणून 12 वर्षीय मुलाला थेट… हताश आईची धक्कादायक कबुली

    काँग्रेस नेते अमित देशमुख यांना चर्चेचे खुले आव्हान

    लातूर महापालिकेच्या निवडणुकीचे वातावरण आता तापायला सुरुवात झाली आहे. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्यावर निशाणा साधत त्यांना खुल्या चर्चेसाठी एका व्यासपीठावर येण्याचे आवाहन केले आहे. महापालिकेत काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात केलेली विकासकामे आणि भाजपने अडीच वर्षांच्या काळात केलेली विकासकामे यावर नागरिकांसमोर येऊन चर्चा करण्यासाठी एका व्यासपीठावर येण्याचे आवाहन करत निलंगेकर यांनी अमित देशमुख यांना डिवचले आहे.

    काँग्रेसच्या कार्यकाळात विकासकामे झाली नसल्याचा आरोप यावेळी निलंगेकरांनी केला असल्याने यावर आता पुढे काय होणार? अमित देशमुख कसं उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा