लातूरमध्ये महापालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. नेमकं काय घडतंय?
जे कोणी निवडणुकीच्या रिंगणात राहिलेत तेही भाजपसोबत येतील, असे मोठे वक्तव्य भाजप नेते तथा माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी लातुरात केले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी डावलल्यामुळे भाजपमधील काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याच्या मुद्द्यावरून कालपासून राजकीय वातावरण तापले आहे. या विषयावर भाष्य करीत आ. निलंगेकरांनी हे वक्तव्य केले आहे.
चिखल फेक करणे हा एकच मुद्दा काँग्रेसकडे आहे
निवडणुकांमध्ये चिखलफेक करणे हा काँग्रेसचा एकमेव मुद्दा राहिला आहे. चिखलफेक करून सामाजिक वातावरण कसे खराब करता येईल, असा प्रयत्न आणि प्रचार काँग्रेसवाले करत असल्याचे म्हणत आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
Nagpur Crime: डॉक्टरांकडे नेले, मारले तरी ऐकत नव्हता; शेवटचा पर्याय म्हणून 12 वर्षीय मुलाला थेट… हताश आईची धक्कादायक कबुली
काँग्रेस नेते अमित देशमुख यांना चर्चेचे खुले आव्हान
लातूर महापालिकेच्या निवडणुकीचे वातावरण आता तापायला सुरुवात झाली आहे. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्यावर निशाणा साधत त्यांना खुल्या चर्चेसाठी एका व्यासपीठावर येण्याचे आवाहन केले आहे. महापालिकेत काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात केलेली विकासकामे आणि भाजपने अडीच वर्षांच्या काळात केलेली विकासकामे यावर नागरिकांसमोर येऊन चर्चा करण्यासाठी एका व्यासपीठावर येण्याचे आवाहन करत निलंगेकर यांनी अमित देशमुख यांना डिवचले आहे.
काँग्रेसच्या कार्यकाळात विकासकामे झाली नसल्याचा आरोप यावेळी निलंगेकरांनी केला असल्याने यावर आता पुढे काय होणार? अमित देशमुख कसं उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
