• Fri. Mar 6th, 2026
    अरुण गवळीच्या मुलीला प्रेमात कसं पाडलं? अभिनेता अक्षय वाघमारेचं दिलखुलास उत्तर, घरुन विरोध होता पण…

    Akshay Waghmare Love Story : अभिनेते अक्षय वाघमारे यांनी ‘दगडी चाळी’तील डॅडीच्या मुलीसोबत सूत कसं जुळलं, हा किस्साही सांगितला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी डॉन अरुण गवळी याची धाकटी कन्या योगिता अरुण गवळी यांनी अखिल भारतीय सेनेकडून भायखळा येथील प्रभाग क्रमांक २०७ मधून उमेदवारी दाखल केली आहे. यानिमित्ताने योगिता गवळी आणि तिचे पती, अभिनेते अक्षय वाघमारे यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनशी संवाद साधला. अनेक वर्षांनी तुरुंगातून बाहेर आलेला अरुण गवळी मुंबईची निवडणूक फिरवणार का? अपक्षांच्या मदतीने मुंबईचा महापौर ठरणार का? यावर योगिता गवळींनी भाष्य केलं. त्याचप्रमाणे अक्षय वाघमारे यांनी ‘दगडी चाळी’तील डॅडीच्या मुलीसोबत सूत कसं जुळलं, हा किस्साही सांगितला.

    कसे जुळले अक्षय-योगिता यांचे प्रेमसंबंध?

    दगडी चाळीबाबत एक दरारा आहे. तुम्ही अरुण गवळीच्या मुलीला प्रेमात पाडण्याचं डेअरिंग कसं काय केलंत? असा प्रश्न अक्षय वाघमारे यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “थोडा अवघड प्रश्न आहे.. योगिताचे कझिन्स माझे मित्र होते. गाठभेट झाली आणि एकमेकांचे स्वभाव आवडले. मी २०१८ मध्ये ती फुलराणी नावाची एक मालिका करत होतो. त्यावेळी ती एमआयटीमध्ये शिक्षण घेत होती. तेव्हा ओळख वाढली आणि बाँडिंग वाढत गेलं. मग घरच्यांचा पाठिंबा आणि आशिर्वादाने लग्न केलं.” याला जोड देताना योगिता गवळी म्हणाल्या, की “फ्रेण्डशिप झोनमध्ये सगळं घडत गेलं. क्लिक व्हावं लागतं, ते झालं. एकमेकांमोबत कम्फर्ट होता”

    घरुन विरोध होता का?

    अरुण गवळीच्या मुलीशी लग्न करायला विरोध झाला का, असं विचारलं असता, अक्षय वाघमारे यांनी सांगितलं, की घरुन थोडा विरोध होता. पण जेव्हा दोन्ही कुटुंबं भेटली, तेव्हा माझ्या आई वडिलांना समजलं की मम्मी डॅडी इतके साधे आहेत. दोन्ही घरचे म्हणाले की संसार तुम्हाला करायचा आहे, त्यामुळे तुम्ही ठरवा, आम्ही काय यामध्ये पडणार नाही, असं अक्षय वाघमारे यांनी सांगितलं.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा