लातूर शहरात महानगरपालिकेसाठी तिरंगी लढत होणार आहे. लातूरमध्ये युती तुटल्यानंतर दिग्गज नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत
काँग्रेस वंचित यांची युती
लातूर शहर महानगरपालिकेसाठी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांची युती जाहीर करण्यात आली आहे. लातूर शहर हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा मात्र मागील निवडणुकीत हा बालेकिल्ला काँग्रेसकडून भाजपाकडे गेलेला पाहायला मिळाला होता. या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये युती साधण्यात अमित देशमुख यांना यश आले आहे.
Pimpri Chinchwad Election: पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अरे’ला ‘कारे’? उमेदवारी अर्जावेळी भाजप नेता पोलिसांवर डाफरला; नेमकं कशावरून बिनसलं?
काँग्रेस 65 तर वंचित बहुजन आघाडी पाच ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस पक्षामधून अनेकांनी निवडणुकीआधीच काढता पाय घेतल्याने काँग्रेसचे ताकद कमी झाल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
भाजपा राष्ट्रवादी आमने-सामने
भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये एकूण आठ बैठका झाल्या मात्र युती साधण्यात अपयश आले आहे. आयत्यावेळी युती विस्कटल्याने दोन्ही पक्षाला याचा फटका बसेल असे बोलले जात आहे. भाजपा दहा जागा देण्यास तयार होता मात्र राष्ट्रवादीकडून एकूण 22 जागेवरती मागणी करण्यात आली होती. भाजपा नेते संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषद घेत युतीमध्ये बिघाडी झाल्याचे स्पष्ट केले आणि आम्ही हात मिळवणीस तयार होतो मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी युती संदर्भात तयारी दर्शवली मात्र राष्ट्रवादीमध्ये आयत्यावेळी आलेल्या काँग्रेसच्या बी टीमनी ही युती मोडल्याचा आरोप संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. या आरोपावरती शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी आम्ही भाजपाला मोठा भाऊ मानले होते मात्र भाजपा ने आमचा घात करण्याचे ठरवले आहे अशा शब्दात टीका केली आहे.
आता निवडणुकीत नेमके काय होईल?
काँग्रेस भाजप व राष्ट्रवादी यांच्यामध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे. मात्र सत्ताधारी पक्ष आमने-सामने झाल्यामुळे आपसूकच काँग्रेसच्या पारड्यामध्ये मताधिक्य पडेल असे जाणकारांकडून बोलले जात आहे.
