• Fri. Mar 6th, 2026
    Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावरील ‘लँडिंग’ मुंबईमार्गेच, कारण काय? कुठूनही विमाने आली की…

    Navi Mumbai International Airport Flights : नवी मुंबई विमानतळ सुरू झालं असलं, तरी त्या विमानांचं लँडिंग मुंबई विमानतळावरुनच होणार आहे. काय आहे यामागचं कारण?

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झालं असलं तरी त्याकडे येणारी विमाने म्हणजेच विमानांचे ‘लँडिंग’ मुंबईच्या सध्याच्या विमानतळामार्फतच होत आहे. विमानांना मुंबईपर्यंत आणून मग नवी मुंबईच्या दिशेने वळवले जात आहे. या विमानतळासाठी नवे मार्ग अद्याप तयार झाले नसल्याने याप्रकारे विमाने उतरवली जात आहेत.

    चार दिवसांपूर्वी सुरू झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज जवळपास 20 विमानांची ये-जा सुरू आहे. प्रामुख्याने दिल्ली, बेंगळुरू, लखनऊ, जयपूर, नागपूर, मोपा (गोवा) या विमानतळांवरून विमाने येतात. मात्र, या विमानांसाठी एका मार्गाखेरीज स्वतंत्र असे मार्ग अद्याप तयार करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे विमानांना मुंबईमार्गेच नवी मुंबई विमानतळाच्या दिशेने नेले जाते व मग ती उतरवले जाते.
    Maharashtra TimesLocal Train : आता लोकलप्रवास सुस्साट… वांद्रे ते अंधेरी, कल्याण-कर्जत, पनवेल-कळंबोली… नव्या 749 लोकल फेऱ्या, कशा-कुठे चालवल्या जाणार?
    देशभरातील सर्व विमानांचे नियंत्रण भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) अखत्यारितील हवाई नियंत्रण कक्षांतर्गत आहे. ‘एएआय’च्या हवाई नियंत्रणाशी संबंधित उच्चाधिकाऱ्यांनी याबाबत ‘ महाराष्ट्र टाइम्स ’ला माहिती दिली. ‘नवी मुंबईसाठी अद्याप नवे मार्ग तयार झालेले नाहीत. कुठूनही विमाने आली की ती सर्वप्रथम मुंबईच्या सध्याच्या विमानतळाकडेच नेहमीच्या मार्गांनी आणली जातात, असे त्यांनी सांगितले.

    सध्या पहिल्या टप्प्यात दिल्ली ते नवी मुंबई हा एकच मार्ग नव्याने तयार करण्यात आला आहे. तो नवी मुंबई विमानतळासाठी विशेषत्वाने तयार करण्यात आला आहे. व्हीआयडीपी (दिल्ली) ते व्हीएएनएम (नवी मुंबई) असा हा मार्ग आहे. सध्याच्या व्हीआयडीपी ते व्हीएबीबी (छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) या मार्गापेक्षा हा पूर्णपणे वेगळा आहे. यामुळे दिल्ली व नवी मुंबई विमानतळादरम्यानचे अंतर हे मुंबईच्या तुलनेत जवळपास 15 मिनिटे कमी झाले आहे.

    या विमानतळाला १०० टक्के दी. बा. पाटील यांचच नाव असणार आहे, संजीव नाईकांचं ठाम मत!

    30 मैलांवरून वळण

    नवी मुंबई विमानतळाकडे येणारी बहुतांश विमाने सध्या मुंबईच्या मार्गानेच येत असताना त्यांना तीन हजार फूट उंचीवरून वळवले जात आहे. विमान तीन हजार फूट उंचीवर व 30 मैल अंतरापर्यंत मुंबईच्याच दिशेने येते. तिथून लहान तात्पुरता मार्ग आकाशात तयार करण्यात येऊन विमाने नवी मुंबई विमानतळाकडे वळवली जात आहेत.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा