• Tue. Jun 9th, 2026
    भाजपचा आक्रमक चेहरा निवडणुकीच्या रिंगणात, नवनाथ बन BMC निवडणूक लढवणार, प्रभाग कोणता?

    Navnath Ban : नवनाथ बन हे भाजपचे आक्रमक प्रवक्ते म्हणून ओळखले जातात. ते पहिल्यांदाच निवडणुकीत नशीब आजमावणार आहेत.

    नवनाथ बन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत, मात्र भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची संपूर्ण यादी जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु भाजपने महाराष्ट्र प्रदेश माध्यम प्रमुख नवनाथ बन यांना तिकीट जाहीर केले आहे. घाटकोपर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १३५ मधून नवनाथ बन निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. बन हे पहिल्यांदाच निवडणुकीत नशीब आजमावणार आहेत.

    नवनाथ बन हे भारतीय जनता पक्षाचा मुंबईतील प्रमुख चेहरा मानला जातात. विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या सणसणीत टीकेला नवनाथ बन यांच्याकडून सडेतोड उत्तर दिले जाते.

    प्रभाग क्रमांक १३५ मध्ये घाटकोपरमधील भटवाडी, किरोल व्हिलेज, नारायणनगर या भागांचा समावेश होतो. मागील निवडणुकीत म्हणजे २०१७ मध्ये या वॉर्डातून शिवसेनेच्या समिक्षा साखरे यांनी बाजी मारली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेस उमेदवार निर्मला सिंह याचा पराभव केला होता. यंदा भारतीय जनता पक्ष नवनाथ बन यांच्या पाठीशी संपूर्ण ताकद लावताना दिसेल.

    बाहरेच्या शेठजीच्या हातात मुंबई द्यायची हा महायुतीचा डाव; ठाकरेंचे शिवसैनिक संतापले!

    कोण आहेत नवनाथ बन?

    राजकारणात येण्यापूर्वी नवनाथ बन यांनी पत्रकारितेत दीर्घकाळ काम केले आहे. त्यांनी एका आघाडीच्या वृत्तवाहिनीमध्ये सुमारे १३ वर्षे काम केले आहे. पत्रकारिता करत असताना राजकारणाची गोडी लागली, राजकीय घडामोडींची त्यांना सखोल जाण आहे. अशातच जानेवारी २०२३ मध्ये त्यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्षप्रवेशानंतर लगेचच त्यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश माध्यम प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
    Maharashtra TimesBMC Election : काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या जागा ‘वंचित’ला, मुख्यालय असलेला प्रभागही सोडला, बड्या नेत्यांची नाराजी
    सध्या ते भाजपचे एक आक्रमक प्रवक्ते म्हणून ओळखले जातात. नवनाथ अनेकदा संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील इतर नेत्यांच्या टीकेला उत्तर देताना दिसतात. ते भाजपच्या वतीने नियमितपणे पत्रकार परिषदा घेतात आणि सोशल मीडियातून पक्षाची भूमिका मांडतात. त्यांनी ‘बटोगे तो कटोगे’ या प्रचार घोषणेचे समर्थन करत विरोधकांवर टीका केली होती.ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील असून सध्या मुंबईत राहतात.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा