उद्धव आणि राज ठाकरे यांचे पक्ष आगामी पालिका निवडणुका युतीत लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्यांची युती उद्या जाहीर होईल, असे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत.
शिवसेना उबाठा मुंबई महापालिकेच्या जवळपास १५० ते १६० जागा लढवेल. राज यांची मनसे ६० ते ७० जागांवर लढेल, असा अंदाज आहे. मुंबईत विधानसभेचे एकूण ३६ मतदारसंघ आहेत. प्रत्येक मतदारसंघात पालिकेचे साधारण ६ प्रभाग येतात. प्रत्येक मतदारसंघात मनसे २ जागा लढवणार आहे. त्यानुसार जागावाटप झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
5 मिनिटं वेळ द्या! NCPच्या हतबल नेत्यांची महाजनांकडे आर्जवं; मंत्री, आमदार कारपर्यंत आले, पण…
शिवसेना उबाठा आणि मनसेची युती झाल्याची घोषणा लवकर करावी. जागावाटप पार पडेल, अशी उद्धव ठाकरेंच्या जवळच्या नेत्यांची भूमिका होती. यासाठी संजय राऊत सर्वाधिक आग्रही होते. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये एकदा युती झाल्याचा संदेश गेला की ते कामाला लागतील, असा उद्धवसेनेच्या नेत्यांचा सूर होता. पण राज ठाकरे यांनी आस्ते कदम धोरण स्वीकारलं.
भांडूप, विक्रोळी, माहीम, शिवडी या विधानसभा मतदारसंघातील प्रभाग, जोगेश्वरी, बोरिवली, मुलुंडमधील काही जागा यावरुन ठाकरेंमध्ये एकमत होत नव्हतं. याच १२ ते १५ जागांवरुन तिढा होता. त्यामुळे युतीची घोषणा लांबली. या जागा राज ठाकरे यांना त्यांच्या विशिष्ट पदाधिकाऱ्यांसाठी हव्या होत्या. पक्षाच्या कठीण काळात सोबत राहिलेल्या नेत्यांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी राज यांना या जागा सोडवून घ्यायच्या होत्या. संपूर्ण जागावाटप पूर्ण होऊ द्या. मगच युतीची घोषणा करा, असा पवित्रा राज यांनी घेतला.
भाईंचा ‘देवाभाऊ पॅटर्न’, ठाकरेंनी केलेली चूक टाळली; भाजप पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर झेप
मुंबईतील काही भागांमध्ये राज यांच्या मनसेची ताकद आहे. या भागात मनसेकडे चांगले उमेदवार आहेत. हे उमेदवार मतं खेचून आणू शकतात, असा विश्वास राज यांना आहे. त्यामुळे या पदाधिकारी, नेत्यांसाठी राज यांनी जागावाटपात आग्रही भूमिका घेतली. याच
जागांसाठी शिवसेना उबाठा आग्रही असल्यानं तिढा सुटण्यास वेळ लागला.
