Ajit Pawar : भाजपच्या या ‘इनकमिंग’ वर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट नाराजी व्यक्त केली असून मोठी पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे
भाजपचं गणित काय?
पुणे महापालिकेत २०१७ च्या निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता होती. महापालिकेतील १६२ पैकी ९७ नगरसेवक हे भाजपचे निवडून आलेले होते. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये दोनने वाढ होत भाजपच्या महापालिकेतील नगरसेवकांची संख्या ही ९९ इतकी झाली. भाजपचे ४१ प्रभागांपैकी १५ प्रभागांमध्ये चारही सदस्य निवडून आले होते. तर, सात प्रभागांमध्ये प्रत्येकी तीन असे २१ नगरसेवक निवडून आले होते. भाजपच्या विजयाचे गणित २२ प्रभागांमध्ये दडलेले होते. या २२ प्रभागांमधूनच ८१ नगरसेवक निवडून आले होते. भाजपने या २२ प्रभागांमध्ये जुळवाजुळव केली असून उर्वरित १९ प्रभागांमध्ये गणित फिरवण्यात येत आहे. ४१ प्रभागांपैकी ३४ प्रभागांमध्ये भाजपचा किमान एकतरी नगरसेवक निवडून आला होता. तर, उर्वरित सात प्रभागांमध्ये विरोधकांची ताकद दिसली होती.
Shrikant Shinde : अंबरनाथ-बदलापूरच्या बालेकिल्ल्यातच शिवसेनेला फटका कशामुळे बसला? भाजपच्या रणनीतीपेक्षाही दुसऱ्या कारणाची चर्चा
राष्ट्रवादी एकसंध असताना ४० नगरसेवक निवडून आले होते. ‘राष्ट्रवादी’चे खराडी-चंदननगर, मुंढवा-मगरपट्टा तसेच वारजे माळवाडी या तीन प्रभागांमध्ये प्रत्येकी चार असे १२ नगरसेवक निवडून आले होते. तर, आंबेगाव-दत्तनगर-कात्रज गावठाण, धनकवडी आंबेगाव पठार आणि कोंढवा खुर्द-मिठानगर या प्रभागांमध्ये प्रत्येकी तीन नगरसेवक निवडून आले होते. रामटेकडी-सय्यदनगर या तीन सदस्यीय प्रभागांमध्ये एक ‘राष्ट्रवादी’ आणि दोन अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. भाजपने वडगाव शेरी विधानसभेचे राष्ट्रवादीचे (शप) आमदार बापू पठारे यांचे चिंरजीव सुरेंद्र पठारे यांचा प्रवेश करून घेऊन दोन प्रभागांतील समिकरणे बदलवली आहेत.
Akhil Chitre : मोहित कंबोज भाजपकडून मुंबईच्या महापौरपदाचे उमेदवार? ठाकरेसेनेच्या दाव्याने खळबळ, फडणवीसांच्या वक्तव्याचा दाखला
ज्या सात प्रभागांमध्ये विरोधकांची ताकद दिसली होती, त्यापैकी पाच प्रभागांमध्ये मोठे ‘इनकमिंग’ करण्यात आले आहे. तर, उर्वरित दोन प्रभागांमध्ये मोठे फेरबदल अपेक्षित असून भाजप प्रवेशाचा दुसरा टप्पा या आठवड्यात होणार आहे. पाच सदस्यीय प्रभाग असलेल्या बालाजीनगर-आंबेगाव-कात्रज या प्रभागातून एक मोठा मासा गळाला लागण्याची शक्यता आहे. असे झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या सर्व प्रभागांमध्ये ‘इनकमिंग’ करून भाजपने शह देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या या ‘इनकमिंग’ वर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट नाराजी व्यक्त केली असून, भाजपमधील बंडखोरांना पुढील काळात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिला जाण्याची शक्यता आहे.
