Nerul-Uran-Belapur Local Train : नवी मुंबईत नेरूळ – उरण आणि बेलापूर – उरण या मार्गावरील रेल्वे फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होऊन चांगली सुविधा मिळेल.
नेरूळ – उरण हा महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प दीड वर्षांपूर्वी सुरू झाला आहे. यामुळे उरण शहर थेट नवी मुंबई, मुंबईशी जोडले गेले आहे. सुरुवातीपासूनच या रेल्वे मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता तर या रेल्वेमध्ये प्रवाशांची गर्दीही वाढू लागली आहे.
Navi Mumbai News : अत्याधुनिक डिझाइन, 100 कोटी खर्च…नवी मुंबईत नवं रेल्वे स्थानक, प्रवाशांची मोठी सुविधा, कसं-कुठे आहे स्टेशन?
नेरूळ, बेलापूर स्थानकातूनच रेल्वे प्रवासी भरून जात आहेत. हीच परिस्थिती उरण रेल्वे स्थानकातही आहे. त्यामुळे या मार्गावर रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून वारंवार केली जात होती. आत्तापर्यंत या दोन्ही रेल्वे मार्गांवर मिळून एकूण 40 फेऱ्या होत्या. मात्र प्रवाशांसाठी त्या अपुऱ्या होत्या. आता या फेऱ्या 50 करण्यात आल्या आहेत.
Mumbai Railway Ticket Fraud : रेल्वेत बोगस AI तिकिटांचा सुळसुळाट ! तपासणीसाठी स्पेशल स्क्वॉड तैनात
दरम्यान, अप आणि डाऊन मार्गावर लोकलच्या फेऱ्या वाढल्याने प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. वाढीव फेऱ्यांमुळे दोन फेऱ्यांमधील अंतर कमी होण्यास मदत होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं. या वाढीव फेऱ्यांमुळे या मार्गावरील गर्दीदेखील कमी होण्यास मदत होणार आहे. उरण वेगात विकसित होणारं शहर असून या इथे लोकल फेऱ्या अधिक नसल्याने वाहतुकीला समस्या येत होती. मात्र आता या मार्गावर फेऱ्या वाढवल्याने प्रवाशांना याचा फायदा होण्यासह या भागातील आर्थिकदृष्ट्या देखील विकास होण्यास मदत होईल. लोकल फेऱ्या वाढल्यामुळे उरण मार्गावर प्रवासी संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. उरण मार्गावरील वाढीव फेऱ्यांसाठी प्रवाशांनी मध्य रेल्वेकडे सतत पत्रव्यवहार केला होता. आता फेऱ्या वाढल्याने प्रवाशांचा चांगली सुविधा मिळून प्रवास अधिक चांगला, सुखकर होण्यास मदत होईल.
