Jalgaon Crime News : जळगावमध्ये पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाबाबत धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांच्या तपासात बेपत्ता तरुणाबाबत समोर आलेल्या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
नेमकं काय घडलं?
गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या जामनेर येथील 27 वर्षीय तरुणाचा मृतदेह रामदेववाडी परिसरातील जंगलातील तलावात पोत्यात बांधलेल्या आढळून आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. जुन्या वादातून या तरुणाची हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुजरात येथून दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
Mira-Bhayandar Leopard Attack : भाईंदरमध्ये रहिवासी इमारतीत बिबट्या, तिघांवर हल्ला; परिसरात भीतीचं वातावरण, VIDEO समोर
जामनेर शहरातील दत्त चैतन्य नगर येथील रहिवासी निलेश राजेंद्र कासार (वय 27) हा तरुण 15 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजल्यापासून अचानक बेपत्ता झाला होता. निलेशचा मोबाईलही बंद असल्याने नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेही आढळला नाही. त्यानंतर तपासादरम्यान रामदेववाडी परिसरात त्याची दुचाकी आढळली. त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात निलेश बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती.
एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यावेळी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना काही संशयास्पद माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथक पाठवून गुजरात राज्यातून भूषण बाळू पाटील आणि दिनेश चौधरी (महाजन) या दोन संशयितांना ताब्यात घेतलं. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी जुन्या किरकोळ वादातून निलेशची हत्या केल्याची कबुली दिली. निलेशला मारून पोत्यात भरून रामदेववाडी येथील जंगलामध्ये असलेल्या पाण्यात त्याचा मृतदेह टाकून दिला, अशी माहितीही आरोपींनी दिली.
Success Story: शिक्षण पूर्ण करत मुंबई-पुण्यात न जाता तरुणाने गावातच शेती पिकवली, प्रयोग यशस्वी झाला अन् पठ्ठ्याने केली लाखोंची कमाई
संशयित आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 19 डिसेंबर रोजी सकाळी एमआयडीसी पोलिसांनी शिरसोली ते रामदेववाडी दरम्यानच्या जंगलात शोधमोहीम राबवली. सकाळी 10 वाजेच्या सुमारास रामदेववाडी येथील घनदाट जंगलात तलावातील पाण्यात निलेशचा मृतदेह आढळला.
अचानक हवेत गॅस पसरला, नागरिकांच्या डोळ्यात अश्रू; आमदार भोळेंनी घेतली जळगाव अधीक्षकांची भेट
जळगाव जिल्ह्यात सध्या कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर असल्याचं चित्र आहे. अनेक ठिकाणी चोरीच्या घटना, दरोडे, हत्या, गोळीबार, शुल्लक कारणावरून हाणामारी अशा घटना जिल्ह्यात वाढत आहेत. कायद्याचा धाक राहिला नसून गुन्हेगारीच्या घटना सर्रास घडत आहेत. सामान्य नागरिक देखील या गुन्हेगारीला कंटाळले असून पोलीस प्रशासनाने अशा टवाळखोरांना कायद्याचा धडा शिकवला गेला पाहिजे, हीच अपेक्षा जळगावकरांकडून व्यक्त केली जात आहे.
