• Fri. Mar 6th, 2026

    Akola News : डोकं ठिकाणावर आहे का? बिबट्याच्या पिल्लाचा किस घेतानाचा Video हायरल, बाजूचे बास बोलले तरी…

    Akola News : डोकं ठिकाणावर आहे का? बिबट्याच्या पिल्लाचा किस घेतानाचा Video हायरल, बाजूचे बास बोलले तरी…

    Man kissing a leopard cub Video : सोशल मीडियावर बिबट्याच्या पिल्लाला किस घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वन विभागाने या प्रकरणी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. नेमकी कुठला व्हिडीओ आहे? जाणून घ्या.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रियंका जाधव, अकोला : राज्यात ग्रांमीण भागांसह शहरांमध्ये बिबट्या दिसत आहेत. सर्वांना प्रश्न पडला आहे की अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात बिबटे कसे काय वाढलेत. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती बिबट्याच्या पिल्लाला घेऊन त्याच्या कपाळावर किस करताना दिसत आहे. नेमका कुठला व्हिडीओ आहे? सर्व माहिती जाणून घ्या.

    एक व्यक्ती बिबट्याच्या पिल्लाला काखेत घेऊन बसल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अकोला–बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कसुरा गावाजवळ बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली आहेत. शेगाव दर्शनासाठी पायदळ वारी करणाऱ्या भाविकांना रस्त्याच्या कडेला अचानक ही बिबट्याची पिल्ले दिसून आली. या मार्गावरून दररोज हजारो भाविक शेगावकडे पायदळ प्रवास करतात.

    Maharashtra Timesखळबळजनक! पंधरा वर्षांपासून पाणी चोरल्याचा आरोप, शिवसेना उबाठाचा नेता अडचणीत; न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल
    बिबट्याची पिल्ले दिसताच काही भाविकांनी त्यांच्यासोबत फोटोसेशन केल्याचेही समोर आले आहे. याच दरम्यान एका व्यक्तीने पिल्लाला काखेत घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यानंतर या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आल्याची माहिती आहे. वन विभागाकडून पिल्लांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असून नागरिकांनी वन्यप्राण्यांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, तसेच त्यांच्याशी छेडछाड करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
    Maharashtra TimesAkola Crime: लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या विवाहित महिलेचा मृत्यू, बॉयफ्रेंडनेच संपवलं, म्हणाला – ती मला… अकोला हादरलं
    राज्यभरात बिबट्यांची दहशत वाढली आहे, कारण गेल्या काही महिन्यांत त्यांच्या आढळण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जंगलाच्या सीमेवर असलेल्या गावांमध्ये रात्रीच्या वेळी बिबटे येत आहेत. तर शेतकऱ्यांना त्यांच्या पाळीव प्राण्यांची चिंता सतावते. स्थानिक प्रशासनाने जागरूकता अभियान सुरू केले असले तरी, बिबट्यांच्या प्रादुर्भावामुळे लोकांमध्ये अनिश्चितता आणि भय निर्माण झाले आहे. पर्यावरणीय असंतुलनामुळे बिबट्यांचे आवास नष्ट होत असल्याने ते मानवी वसाहतींकडे धाव घेत आहेत, ज्यामुळे भविष्यातील संघर्ष टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना आवश्यक बनल्या आहेत.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.… आणखी वाचा