Cold Wave in Maharashtra :देशभरासह राज्यातही थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये तापामानाचा पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली गेला आहे. भारतीय हवामान विभागाने थंडीचा यलो अलर्ट दिला असून पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे.
राज्यात थंडीचा कडाका वाढणार
गेल्या 24 तासांत शहरातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवसांत किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहील असा अंदाज आहे.
Thane News : घोडबंदर रोडवर शुक्रवारपासून वाहतूक बदल, पुन्हा कोंडीची शक्यता; कसे असतील पर्यायी मार्ग?
सध्या पुण्यात तापमानाचा पारा 8.9 अंशांवर पोहोचला आहे. मुंबईतही तापमानाचा पारा घसरला असल्याने थंडी वाढली आहे. हवामान खात्याने राज्यात थंडीचा यलो अलर्ट जारी केला असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये हा अलर्ट देण्यात आला आहे.
सिद्धेश्वर एक्सप्रेसमधून साडे पाच कोटींचं सोनं गायब, एसी फर्स्ट क्लासमधून कल्याणदरम्यान घटना उघडकीस; नेमकं काय घडलं?
सर्वाधिक निचांकी तापमान धुळ्यात
दरम्यान, राज्यातील सर्वात निचांकी तापमान धुळे जिल्ह्यात नोंदवलं गेलं आहे. धुळ्यातील तापमान 5.3 अंश सेल्सिअस आहे. तर परभणीमध्ये 5.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुणे, गोंदिया, जळगाव, अहिल्यानगर या भागात तापमानाचा पारा 9 अंशापर्यंत घसरला आहे. पुढील काही दिवसांत हा पारा आणखी कमी होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, देशातील सर्वात निचांकी तापमान पंजाबमधील गुरूदासपूर नोंदवण्यात आलं आहे. तेथील तापमान 4.5 अंश सेल्सिअस इतकं नोंद करण्यात आलं आहे.
केरळ, तमिळनाडूत पावसाचा इशारा
एकीकडे कडाक्याची थंडी असताना केरळ, तामिळनाडू, कर्नाटकात हवामान खात्यान पावसाचा इशारा दिला आहे. 10, 11, 12 आणि 13 डिसेंबर असे चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा जारी देण्यात आला आहे.
