• Sat. Mar 14th, 2026

    ठाणेकरांसाठी मोठी बातमी! शहरात तीन दिवसांसाठी 30 टक्के पाणी कपात; पाहा कधीपासून होणार लागू

    ठाणेकरांसाठी मोठी बातमी! शहरात तीन दिवसांसाठी 30 टक्के पाणी कपात; पाहा कधीपासून होणार लागू

    Thane Water Cut: मुंबईनंतर आता ठाण्यातही 30 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. पिसे बंधारा ते टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी जलवाहिनी कल्याण फाटा येथे नादुरुस्त झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

    ठाणे: मुंबईत नुकतीच 15 टक्के पाणी कपात लागू झाल्यानंतर, आता ठाणेकरांवर त्याहून मोठा ताण येणार आहे. ठाणे महापालिकेने शहरात 30 टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला असून, ही कपात उद्यापासूनच प्रभावी होणार आहे. अचानक झालेल्या या निर्णयामुळे लाखो नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होणार आहे.

    ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे बंधाऱ्यावरून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी 1000 मि.मी. व्यासाची महत्त्वाची जलवाहिनी शनिवार, 6 डिसेंबर रोजी सकाळी कल्याण फाटा येथे नादुरुस्त झाली. महानगर गॅसच्या सुरू असलेल्या कामांदरम्यान ही पाइपलाइन अचानक तुटल्याची माहिती समोर आली आहे.

    Maharashtra Timesमुंबईकरांवर पुन्हा जलसंकट! आज 8 तासांसाठी शहरातील पाणीपुरवठा बंद; कधी आणि कुठे होणार परिणाम?

    पाणीपुरवठा विभागाकडून दुरुस्तीची कामे दोन दिवसांपासून युद्धपातळीवर सुरू असली तरी, जलवाहिनी जुनी आणि प्री-स्ट्रेस काँक्रीट पद्धतीची असल्याने दुरुस्तीला आणखी किमान तीन दिवस लागू शकतात, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. परिणामी, ठाण्याकडे येणारा पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात घटला आहे.

    कपातीचा परिणाम शहरभर समान रीतीने वाटण्यासाठी महापालिका 11 डिसेंबरपर्यंत झोनिंग पद्धतीने पाणीपुरवठा करणार आहे. त्यामुळे अनेक भागांत पाणीपुरवठा वेळोवेळी खंडित होईल व काही ठिकाणी पाण्याचा दाबही कमी राहणार आहे. नागरिकांना अनियमित आणि कमी प्रमाणातील पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागणार आहे. अचानक लागलेल्या पाणी कपातीमुळे ठाणेकरांच्या अडचणी वाढणार असून, स्वयंपाकापासून पिण्याच्या पाण्यापर्यंत सर्व बाबींवर त्याचा परिणाम होणार आहे. महापालिकेने नागरिकांना पुढील काही दिवसांकरिता पुरेसा पाणी साठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे निर्देश दिले आहेत.

    भाजपचा ॲनाकोंडा शिंदे-अजितदादा गटाला गिळणार; उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर

    मुंबईतील काही भागांत रविवारी तब्बल 8 तास पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. तसेच, 8 डिसेंबरपासून शहरात 15 टक्के पाणी कपात लागू झाली आहे. तिथेही जलवाहिनी दुरुस्तीचे मोठे काम सुरू असून 14 विभागांचा पुरवठा प्रभावित झाला होता. मात्र, ठाण्याची स्थिती अधिक गंभीर आहे, कारण संपूर्ण शहरात 30 टक्के कपात लागू होणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा