• Sun. Mar 8th, 2026

    एका तासाचा प्रवास 5 मिनिटांत! ‘या’ एलिव्हेटेड रोडमुळे मुंबईतील वाहतूक कोंडी फुटणार; कुठून-कुठे जोडणार नवा मार्ग?

    एका तासाचा प्रवास 5 मिनिटांत! ‘या’ एलिव्हेटेड रोडमुळे मुंबईतील वाहतूक कोंडी फुटणार; कुठून-कुठे जोडणार नवा मार्ग?

    Dahisar-Bhayander Link Road: मुंबई महापालिकेचा दहिसर ते भाईंदर लिंक रोड प्रकल्प मंजूर झाला आहे. २३३७ कोटींच्या या प्रकल्पाने एका तासाचा प्रवास केवळ ५ मिनिटांत होणार आहे.

    मुंबई: मुंबई महापालिकेच्या नवीन प्रकल्पामुळे दहिसर ते भाईंदर हा प्रवास, जो सध्या जवळपास एका तासाचा असतो, अवघ्या 5 मिनिटांत पूर्ण होणार आहे. दहिसर-भाईंदर लिंक रोड ( DBLR ) प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून, मुंबईतील कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी सुधारणा होणार आहे. 2,337 कोटी रुपयांचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर या मार्गावरील वाहतूक कोंडी जवळपास संपुष्टात येणार आहे.

    मेट्रोपासून उन्नत मार्ग

    दहिसर-भाईंदर लिंक रोड हा बीएमसीच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा अंतिम भाग आहे. कोस्टल रोडचा हा टप्पा सहा पॅकेजमध्ये विभागलेला असून, DBLR योजनेचा शेवटचा ‘F’ पॅकेज गोराईला दहिसरशी जोडतो. दहिसर येथे एलिव्हेटेड कॉरिडॉर कांदरपाडा मेट्रो स्थानकाच्या जवळ सुरू होणार असून, भाईंदर पश्चिमेतील सुभाषचंद्र बोस गार्डन येथे येऊन संपेल.Maharashtra Timesबोरिवली ते नाशिक प्रवास सुस्साट! ‘समृद्धी’मार्गे ST महामंडळाची नवी ई-एसी बससेवा सुरु, पाहा वेळापत्रक

    हा रस्ता अनेक संवेदनशील कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) क्षेत्रांमधून जाणार आहे. यात खारफुटीची जंगले, दहिसर खाडी आणि मीठाच्या जमिनीचा समावेश आहे. त्यामुळे या प्रकल्पाला पर्यावरणीय दृष्टीनेही महत्त्व आहे. सध्या दहिसर ते भाईंदर या 10 किमी अंतरासाठी प्रवाशांना पश्चिम द्रुतगती मार्गाचा वापर करावा लागतो. काशिमिरा आणि दहिसर चेक नाक्यावर कायम वाहतूक कोंडी असल्यामुळे हा प्रवास अनेकदा 50 ते 60 मिनिटे घेतो. उन्नत दहिसर-भाईंदर लिंक रोड पूर्ण झाल्यावर प्रवाशांना ही कोंडी टाळता येणार असून, संपूर्ण प्रवास अवघ्या 5 मिनिटांत होणार आहे.

    कधी होणार पूर्ण?

    या उन्नत मार्गाची लांबी 4.58 किमी असून, दहिसर आणि भाईंदर टोकांवरील इंटरचेंज आणि रॅम्पची एकूण लांबी 3.64 किमी असणार आहे. DBLR हा 45 मीटर रुंदीचा एलिव्हेटेड रोड असण्याचा प्रस्ताव आहे, ज्यामुळे वाहतूक क्षमतेत मोठी वाढ होईल. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सुमारे 3.5 वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे हा मार्ग 2029 पर्यंत वापरासाठी खुला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    Supriya Sule | इंडिगो विमानसेवा विस्कळीत, भारत सरकारने ॲक्शन घ्यावी; सुप्रिया सुळे भडकल्या

    “दहिसर ते भाईंदर दरम्यान 45 मीटर रुंदीचा उन्नत रस्ता बांधण्यासाठी आम्ही प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्यासाठी निविदा काढली आहे. हा कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याचा शेवटचा टप्पा आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर वाहतूक लक्षणीयरीत्या कमी होईल, वेळ आणि इंधनाची बचत होईल, कार्बन उत्सर्जन घटेल आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील,” अशी माहिती बीएमसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी द इंडियन एक्सप्रेसला दिली,

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा