• Thu. Mar 12th, 2026
    Mumbai News: शीव उड्डाणपूल जूनपर्यंत; पावसाळ्याआधी सर्व कामे पूर्ण करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट

    Sion Flyover Mumbai: शीव पुलाचे रेल्वे हद्दीतील काम रेल्वे आणि पोहोच मार्ग, दोन पादचारी भुयारी मार्ग आदींचे काम मुंबई महापालिका करत आहे.

    shiv flyover(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : शीव (सायन) उड्डाणपुलाच्या काम मे २०२६पर्यंत पूर्ण होणार आहे. या उड्डाणपुलाची कामे मे २०२६पर्यंत पूर्ण झालीच पाहिजेच, असे निर्देश मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे जून २०२६पासून पूल वाहतुकीस खुला होईल, असे संकेत आहेत.

    शीव पूर्व-पश्चिम भागांना जोडणाऱ्या शीव उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचा आढावा अतिरिक्त महापालिका आयुक्त बांगर आणि पोलिस सहआयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांनी मंगळवारी घेतला. त्यावेळी बांगर यांनी हे निर्देश दिले. यावेळी महापालिकेचे पायाभूत सुविधांचे उपायुक्त गिरीश निकम यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

    Maharashtra Timesउद्धव ठाकरेंच्या नावे अटक वॉरंट काढा, प्रकाश आंबेडकर यांची कोर्टाला विनंती, काय आहे प्रकरण?
    लाल बहादूर शास्त्री मार्ग वरील भुयारी मार्गाचे काम डिसेंबर २०२५पर्यंत पूर्ण केले जाईल. धारावी बाजूकडील दुसऱ्या भुयारी मार्गाचे काम फेब्रुवारी २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल. रेल्वे पुलावरील उत्तर दिशेच्या अर्ध्या बाजूवर गर्डर स्थापित करण्याची कार्यवाही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात केली जाईल. त्यानंतर रेल्वे हद्दीतील इतर कामे पूर्ण केली जातील.

    धारावी आणि लाल बहादूर शास्त्री मार्गाकडे जाणाऱ्या पोहोच रस्त्यांची कामे १५ एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण केली जातील. १५ एप्रिल २०२६ नंतर पूर्व बाजूच्या पोहोच रस्त्यांची कामे सुरू करण्यात येतील. हे काम पूर्ण करण्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. या कालमर्यादेनुसार कार्यवाही झाली तर ३१ मे २०२६ पर्यंत पूल पूर्णत: तयार होईल. तसेच १ जून २०२६पासून पूल वाहतुकीस खुला करणे शक्य होईल, असेही बांगर यांनी स्पष्ट केले.

    नागपूर आणि अंबाला या ठिकाणी गर्डरचे उत्पादन सुरू आहे. या दोन्ही ठिकाणी मुंबई महापालिकेचे प्रतिनिधी पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत. फॅब्रिकेशन कार्यवाहीवर देखरेख ठेवणे आणि गर्डर वेळेवर उपलब्ध करण्याची जबाबदारी महापालिका प्रतिनिधींवर आहे. एकंदरीत महापालिका आणि रेल्वे प्रशासन परस्पर समन्वय साधून काम करणार आहेत.

    Maharashtra Timesभाजपचा डाव करेक्ट ओळखला, भाई सावध; शिंदेंचा ‘देवाभाऊ पॅटर्न’, यंदा ‘ती’ चूक शिताफीनं टाळली
    बेलासिस पुलाच्या कामाला वेग
    ताडदेव-नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन १३० वर्षे जुन्या बेलासिस उड्डाणपुलाच्या पुनर्बाधणीला वेग आला आहे. पुलाचे रेल्वे हद्दीतील काम पश्चिम रेल्वे करत असून, पुलाच्या पोहोच रस्त्याची उभारणी मुंबई महापालिका करत आहे. बेलासिस पुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी म्हणजेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. पूल प्रकल्प पूर्णत्वाचा कालावधी एप्रिल २०२६पर्यंत आहे. मात्र या पुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वीच पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा